Prashant.bharvirkar@timesgroup.com
Tweet : bharvirkarPMT
महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यचळवळीला अध्यात्माचे अधिष्ठान असल्याने त्यांनी या चळवळीचा प्रारंभ करताना नाशिकला येऊन शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे आशीर्वाद घेतले होते. लोकमान्य टिळक व डॉ. कुर्तकोटी यांचे निकटचे संबंध लक्षात घेता भविष्यात कुर्तकोटींचे सहकार्य लाभावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले असून, शंकराचार्यांचा 'यशस्वी भव:' असा आशीर्वाद मिळाल्यानंतरच गांधीजींनी नाशिकमधून प्रथमत: असहकार चळवळीचे रणशिंग फुंकले.
खऱ्या अर्थाने गांधीयुगाची सुरुवात १९२० नंतर झाली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व ते करू लागले. सत्य, अहिंसा आणि प्रेम या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांचे कार्य सुरू झाले. त्यांचा धर्म म्हणजेच प्रेम, समाजाची सेवा आणि ध्येय म्हणजेच सत्य गांधीजींचे हे तत्त्वज्ञान भारतीयांच्या मनामनामध्ये भरले. असहकार आणि सविनय कायदेभंग या चळवळी त्यांनी इंग्रजांना विरोध करण्यासाठी सुरू केल्या व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनास मदत होऊ लागली. गांधीजींनी सामान्य जनतेला राजकारणात सहभागी करून घेतले. हे करत असतानाच अध्यात्माचे अधिष्ठान त्यांनी कायम ठेवले त्यासाठीच करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांची नाशिकमध्ये भेट घेऊन गांधीजींनी आशीर्वाद घेतले. त्याचवेळी एक मोठी जाहीर सभाही यशवंतराव महाराज पटांगणावर त्यांनी घेतली होती.
लेखक देवेन्द्रनाथ पंड्या यांच्या 'आपलं नाशिक' पुस्तकातील उल्लेखानुसार '१९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले व गांधीयुगास प्रारंभ झाला. असहकाराच्या कार्यक्रमाद्वारे एक वर्षांत स्वराज्य मिळविण्याचा गांधीजींचा कार्यक्रम राष्ट्राने स्वीकारला. या कार्यक्रमात नाशिक शहराने मोठा भाग घेतला. १९२० मध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू यांनी नाशिकला भेट दिली. यशवंतराव महाराज पटांगणावरील प्रचंड सभेत त्यांनी असहकाराचा संदेश सांगितला. या सभेत विठ्ठलराव उपाध्ये यांनी वकिली सोडल्याचे जाहीर केले. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी त्यावेळी भटजी महाराजांच्या मठात रहात. त्यांचा गांधीजींनी आपल्या चळवळीस आशीर्वाद घेतला. असहकाराच्या आंदोलनांतील सर्व कार्यक्रमांचा प्रारंभ नाशिकमध्ये करण्यात आला.' असे वर्णन येते. यावरून महात्मा गांधींच्या राजकीय आराखड्यात नाशिकला विशेष स्थान होते हे लक्षात येते.
'ओताबापानो वडलो'मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर
प्रभूदास गांधी यांनी संपादित केलेले गुजराथी भाषेतील पुस्तक 'ओताबापानो वडलो' अर्थात 'गांधीजींच्या मूळ पुरूषांची वंशावळ' यामध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरचा उल्लेख आलेला आहे. परदेशगमन केल्याने देहशुद्धीसाठी गांधीजींना नाशिकला येऊन रामकुंडात स्नान करावे लागल्याचा उल्लेख या पुस्तकात असून, गंगाराम जगन्नाथ गोधळी (गायधनी) व श्री छर जयराम दीक्षित यांच्या सह्या असलेले शुद्धीपत्र त्यांना देण्यात आले होते. तसेच शुक्रवार, वैशाख वद्य चतुर्थी संवत १९२९ मध्ये गांधीजी त्यांच्या परिवारासह त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता तेथील गोर (तीर्थेापाध्याय) विश्वेश्वर त्र्यंबक नागेश्वर मुंगापडोळी यांच्याकडे ते थांबले असल्याचा उल्लेख 'ओताबापानो वडलो' यात आहे.
Tweet : bharvirkarPMT
महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यचळवळीला अध्यात्माचे अधिष्ठान असल्याने त्यांनी या चळवळीचा प्रारंभ करताना नाशिकला येऊन शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे आशीर्वाद घेतले होते. लोकमान्य टिळक व डॉ. कुर्तकोटी यांचे निकटचे संबंध लक्षात घेता भविष्यात कुर्तकोटींचे सहकार्य लाभावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले असून, शंकराचार्यांचा 'यशस्वी भव:' असा आशीर्वाद मिळाल्यानंतरच गांधीजींनी नाशिकमधून प्रथमत: असहकार चळवळीचे रणशिंग फुंकले.
खऱ्या अर्थाने गांधीयुगाची सुरुवात १९२० नंतर झाली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व ते करू लागले. सत्य, अहिंसा आणि प्रेम या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांचे कार्य सुरू झाले. त्यांचा धर्म म्हणजेच प्रेम, समाजाची सेवा आणि ध्येय म्हणजेच सत्य गांधीजींचे हे तत्त्वज्ञान भारतीयांच्या मनामनामध्ये भरले. असहकार आणि सविनय कायदेभंग या चळवळी त्यांनी इंग्रजांना विरोध करण्यासाठी सुरू केल्या व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनास मदत होऊ लागली. गांधीजींनी सामान्य जनतेला राजकारणात सहभागी करून घेतले. हे करत असतानाच अध्यात्माचे अधिष्ठान त्यांनी कायम ठेवले त्यासाठीच करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांची नाशिकमध्ये भेट घेऊन गांधीजींनी आशीर्वाद घेतले. त्याचवेळी एक मोठी जाहीर सभाही यशवंतराव महाराज पटांगणावर त्यांनी घेतली होती.
लेखक देवेन्द्रनाथ पंड्या यांच्या 'आपलं नाशिक' पुस्तकातील उल्लेखानुसार '१९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले व गांधीयुगास प्रारंभ झाला. असहकाराच्या कार्यक्रमाद्वारे एक वर्षांत स्वराज्य मिळविण्याचा गांधीजींचा कार्यक्रम राष्ट्राने स्वीकारला. या कार्यक्रमात नाशिक शहराने मोठा भाग घेतला. १९२० मध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू यांनी नाशिकला भेट दिली. यशवंतराव महाराज पटांगणावरील प्रचंड सभेत त्यांनी असहकाराचा संदेश सांगितला. या सभेत विठ्ठलराव उपाध्ये यांनी वकिली सोडल्याचे जाहीर केले. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी त्यावेळी भटजी महाराजांच्या मठात रहात. त्यांचा गांधीजींनी आपल्या चळवळीस आशीर्वाद घेतला. असहकाराच्या आंदोलनांतील सर्व कार्यक्रमांचा प्रारंभ नाशिकमध्ये करण्यात आला.' असे वर्णन येते. यावरून महात्मा गांधींच्या राजकीय आराखड्यात नाशिकला विशेष स्थान होते हे लक्षात येते.
'ओताबापानो वडलो'मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर
प्रभूदास गांधी यांनी संपादित केलेले गुजराथी भाषेतील पुस्तक 'ओताबापानो वडलो' अर्थात 'गांधीजींच्या मूळ पुरूषांची वंशावळ' यामध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरचा उल्लेख आलेला आहे. परदेशगमन केल्याने देहशुद्धीसाठी गांधीजींना नाशिकला येऊन रामकुंडात स्नान करावे लागल्याचा उल्लेख या पुस्तकात असून, गंगाराम जगन्नाथ गोधळी (गायधनी) व श्री छर जयराम दीक्षित यांच्या सह्या असलेले शुद्धीपत्र त्यांना देण्यात आले होते. तसेच शुक्रवार, वैशाख वद्य चतुर्थी संवत १९२९ मध्ये गांधीजी त्यांच्या परिवारासह त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता तेथील गोर (तीर्थेापाध्याय) विश्वेश्वर त्र्यंबक नागेश्वर मुंगापडोळी यांच्याकडे ते थांबले असल्याचा उल्लेख 'ओताबापानो वडलो' यात आहे.