म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विघ्नहर्त्याच्या घरातील आगमनासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसली तरीही पंचाग पाहिले जात असल्याने काही बाबींचे ठोकताळे यंदाच्या वर्षीही सांगण्यात आले आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते यंदा गणेश स्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त शुभ राहणार आहे. परंतु, ज्यांना भद्राकालात विशेष रस नाही ते अभिजात किंवा अमृत चौघडिया मुहूर्तावरही गणेशाचे स्थापन करू शकतील.
यंदा गणेश चतुर्थी ५ सप्टेंबर रोजी येत आहे. यावेळेस गणेश चतुर्थीवर भद्राकालाचे सावट राहणार असल्याने काही गोष्टी टाळण्याचा सल्ला जोतिष्यांनी दिला आहे. ५ तारखेला सकाळी ७.५८ पासून भद्राकाल सुरू होणार आहे. हा काल रात्री ९.०४ वाजता संपणार आहे. ज्योतिष्यानुसार 'भद्राकाल'मध्ये कुठलेही शुभ मुहूर्त आणि प्रतिमास्थापना शुभ मानली जात नाही म्हणून 'भद्राकाल'ला सोडून गणेश प्रतिमा स्थापनेसाठी सकाळी ६.१५ ते ७.४५ वाजेपर्यंत अमृत चौघडिया सर्वात श्रेष्ठ काल राहणार आहे. ज्योतिष गणनेनसार गणपती प्रथम पूज्य देव मानले गेले आहे, म्हणून गणेश स्थापनेसाठी कुठले ही मुहूर्त बघायची गरज नसते. अशात भाविक दुपारी १२.१५ ते १ वाजेपर्यंत अभिजात मुहूर्त, दुपारी ३ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत लाभ व सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत अमृत चौघडियामध्ये देखील गणेश स्थापना करू शकतील. जे लोग 'भद्राकाला'ला मानत नाही ते दुपारी अभिजात मुहूर्तात किंवा सायंकाळी लाभ, अमृतच्या चौघडियात देखील प्रतिमेची स्थापना करू शकतात.
पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करावी. गणपती अथर्वशीर्ष वाचावे व यथासांग पूजा व आरती करावी.
- अमोल किरपेकर, गुरूजी
विघ्नहर्त्याच्या घरातील आगमनासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसली तरीही पंचाग पाहिले जात असल्याने काही बाबींचे ठोकताळे यंदाच्या वर्षीही सांगण्यात आले आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते यंदा गणेश स्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त शुभ राहणार आहे. परंतु, ज्यांना भद्राकालात विशेष रस नाही ते अभिजात किंवा अमृत चौघडिया मुहूर्तावरही गणेशाचे स्थापन करू शकतील.
यंदा गणेश चतुर्थी ५ सप्टेंबर रोजी येत आहे. यावेळेस गणेश चतुर्थीवर भद्राकालाचे सावट राहणार असल्याने काही गोष्टी टाळण्याचा सल्ला जोतिष्यांनी दिला आहे. ५ तारखेला सकाळी ७.५८ पासून भद्राकाल सुरू होणार आहे. हा काल रात्री ९.०४ वाजता संपणार आहे. ज्योतिष्यानुसार 'भद्राकाल'मध्ये कुठलेही शुभ मुहूर्त आणि प्रतिमास्थापना शुभ मानली जात नाही म्हणून 'भद्राकाल'ला सोडून गणेश प्रतिमा स्थापनेसाठी सकाळी ६.१५ ते ७.४५ वाजेपर्यंत अमृत चौघडिया सर्वात श्रेष्ठ काल राहणार आहे. ज्योतिष गणनेनसार गणपती प्रथम पूज्य देव मानले गेले आहे, म्हणून गणेश स्थापनेसाठी कुठले ही मुहूर्त बघायची गरज नसते. अशात भाविक दुपारी १२.१५ ते १ वाजेपर्यंत अभिजात मुहूर्त, दुपारी ३ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत लाभ व सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत अमृत चौघडियामध्ये देखील गणेश स्थापना करू शकतील. जे लोग 'भद्राकाला'ला मानत नाही ते दुपारी अभिजात मुहूर्तात किंवा सायंकाळी लाभ, अमृतच्या चौघडियात देखील प्रतिमेची स्थापना करू शकतात.
पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करावी. गणपती अथर्वशीर्ष वाचावे व यथासांग पूजा व आरती करावी.
- अमोल किरपेकर, गुरूजी