म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक गणेश मंडळांची रोषणाई, डीजे, देखावे यांचे अप्रूप सर्वांनाच असते. गणेशोत्सवातील दहा दिवसांत लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी मंडळे मागे-पुढे पाहत नाहीत. यंदा मात्र काही मंडळांच्या सदस्यांमध्ये गंभीर शांतता पसरल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे मंडळांच्या जुगार अड्ड्यांवर असलेली पोलिसांची करडी नजर. कारण वर्गणी तोकडी पडत असल्याने मंडळांना ‘नाल’चाच काय तो आधार होता. मात्र, पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे यंदा नाल (कमिशन) मिळेल की नाही, याची चिंता काही मंडळांना पडली आहे. सुदैवाने महापालिका निवडणूक तोंडावर असून, नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारच अशा मंडळांसाठी तारणहार ठरू शकणार आहेत. त्या दृष्टीने मंडळांचे पदाधिकारी कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात मोठ्या स्वरूपाची ३५०, तर मध्यम स्वरूपाची सुमारे ७५० मंडळे कार्यरत असून, यंदा या संख्येत काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी शहर व परिसरात लहान-मोठ्या एक हजार गणेश मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता. यंदा किमान १०० पेक्षा जास्त मंडळे सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहे ‘नाल’?
गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते. हे पैसे एक तर वर्गणीच्या माध्यमातून जमा होतात किंवा जुगारातून मिळणाऱ्या पैशांवर! जुगार खेळणारे ‘खेळिये’ या दहा दिवसांत गणेश मंडळांना नाल (कमिशन) देतात. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच हे जुगार अड्डे सुरू होतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांवरच मंडळाचा पुढील खर्च भागविला जातो.
पोलिस आक्रमक
यंदा, जुगार अड्ड्यांविरोधात शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच २१ जुलै रोजी शहर पोलिसांनी मुंबई नाका येथील सर्वांत मोठा जुगार अड्डा उद््ध्वस्त केला. पोलिसांनी ४१ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच दुचाकी असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. विशेष म्हणजे यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. याचमुळे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पोलिसांच्या या आक्रमकतेची जाणीव जुगाऱ्यांना असून, सगळ्यांचे लक्ष आता नवीन पोलिस आयुक्तांकडे लागले आहे.
जुगार कशासाठी आणि कोणत्या कारणांमुळे होतो हे जाणून घेण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. जुगार खेळणारे आणि खेळवणारे कायद्याचा भंग करतात, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणारच. जुगार अड्डा सुरू राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ.
- सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच
सार्वजनिक गणेश मंडळांची रोषणाई, डीजे, देखावे यांचे अप्रूप सर्वांनाच असते. गणेशोत्सवातील दहा दिवसांत लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी मंडळे मागे-पुढे पाहत नाहीत. यंदा मात्र काही मंडळांच्या सदस्यांमध्ये गंभीर शांतता पसरल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे मंडळांच्या जुगार अड्ड्यांवर असलेली पोलिसांची करडी नजर. कारण वर्गणी तोकडी पडत असल्याने मंडळांना ‘नाल’चाच काय तो आधार होता. मात्र, पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे यंदा नाल (कमिशन) मिळेल की नाही, याची चिंता काही मंडळांना पडली आहे. सुदैवाने महापालिका निवडणूक तोंडावर असून, नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारच अशा मंडळांसाठी तारणहार ठरू शकणार आहेत. त्या दृष्टीने मंडळांचे पदाधिकारी कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात मोठ्या स्वरूपाची ३५०, तर मध्यम स्वरूपाची सुमारे ७५० मंडळे कार्यरत असून, यंदा या संख्येत काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी शहर व परिसरात लहान-मोठ्या एक हजार गणेश मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता. यंदा किमान १०० पेक्षा जास्त मंडळे सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहे ‘नाल’?
गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते. हे पैसे एक तर वर्गणीच्या माध्यमातून जमा होतात किंवा जुगारातून मिळणाऱ्या पैशांवर! जुगार खेळणारे ‘खेळिये’ या दहा दिवसांत गणेश मंडळांना नाल (कमिशन) देतात. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच हे जुगार अड्डे सुरू होतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांवरच मंडळाचा पुढील खर्च भागविला जातो.
पोलिस आक्रमक
यंदा, जुगार अड्ड्यांविरोधात शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच २१ जुलै रोजी शहर पोलिसांनी मुंबई नाका येथील सर्वांत मोठा जुगार अड्डा उद््ध्वस्त केला. पोलिसांनी ४१ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच दुचाकी असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. विशेष म्हणजे यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. याचमुळे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पोलिसांच्या या आक्रमकतेची जाणीव जुगाऱ्यांना असून, सगळ्यांचे लक्ष आता नवीन पोलिस आयुक्तांकडे लागले आहे.
जुगार कशासाठी आणि कोणत्या कारणांमुळे होतो हे जाणून घेण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. जुगार खेळणारे आणि खेळवणारे कायद्याचा भंग करतात, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणारच. जुगार अड्डा सुरू राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ.
- सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच