अ‍ॅपशहर

गणेशवाडी भाजीमार्केट चकाचक

गणेशवाडी रस्त्यालगत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट दुर्लक्षित झाल्यामुळे तेथे प्रचंड घाण साचली होती. भाजीविक्रेते आणि महापालिका यांच्या वादामुळे वापराविना पडून असलेले हे भाजीमार्केट बेघरांचे आणि भिकाऱ्यांचे निवासस्थान म्हणूनच नाही, त्यांचे स्वच्छतागृहदेखील बनले होते. मात्र नूतन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पाहणी करतील या भीतीने हे मार्केट स्वच्छ करण्यात आलेले आहे.

Maharashtra Times 18 Feb 2018, 4:00 am
मनपा आयुक्तांच्या पाहणीच्या भीतीने स्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम market clean


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडी रस्त्यालगत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट दुर्लक्षित झाल्यामुळे तेथे प्रचंड घाण साचली होती. भाजीविक्रेते आणि महापालिका यांच्या वादामुळे वापराविना पडून असलेले हे भाजीमार्केट बेघरांचे आणि भिकाऱ्यांचे निवासस्थान म्हणूनच नाही, त्यांचे स्वच्छतागृहदेखील बनले होते. मात्र नूतन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पाहणी करतील या भीतीने हे मार्केट स्वच्छ करण्यात आलेले आहे.

महापालिकेत नुकतेच बदलून आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीबाजाराला पाहणी होण्याच्या अगोदरच त्याची स्वच्छता करण्याची दक्षता पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्केटमधील घाण दूर होऊन मार्केट चकाचक झालेले आहे.

नाशिक शहर हे हागणदारीमुक्त शहर असल्याचे जाहीर केले गेले असले तरी या मार्केटमध्ये पाहणी केल्यानंतर किती घाण आणि दुर्गंधी पसरली होती याची कल्पना आली असती. अशा भागात जर आयुक्त मुंढे यांनी पाहणी केली तर काय होईल या भीतीपोटी येथील स्वच्छतेच्या कामाला प्रचंड गती देण्यात आली. तसेच तातडीने हे अत्यंत घाण असलेले मार्केट स्वच्छ करण्यात आले.

अधिकाऱ्यांची दक्षता

काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाघाटाची पाहणी केली होती. त्यावेळी म्हसोबा पटांगण येथे पाहणी करीत असताना त्यांना गणेशवाडीचे भाजीमार्केटही बघून घ्या, असा आग्रह धरला. मात्र, मुंढे यांनी आज गोदाघाट बघायचा आहे असे म्हणत भाजीमार्केटकडे जाण्याचे टाळले. त्यांची या भाजी मार्केटमध्ये कधीही व्हिजिट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून भाजीबाजाराच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

भाजीबाजाराचा मोकळा श्वास

या स्वच्छतेदरम्यान या मार्केअमध्ये बस्तान बसविलेल्या लोकांना येथून हाकलण्यात आले. याठिकाणी भाजीबाजार भरत नसल्याने शौचालय आणि मुतारीसाठीच या भाजीमार्केटचा वापर केला जात होता. तो आता थांबणार असून, या भाजीबाजाराला मोकळा श्वास घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भाजीमार्केटची अवस्था अत्यंत खराब झाली होती. येथून येता-जाताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या इमारतीच्या पायऱ्या आणि मागची बाजूचा वापर शौचालयासाठी केला जात असल्यामुळे येथे घाण साचली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज