अ‍ॅपशहर

‘महामंडळांनाही कर्जमाफी द्या’

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महामंडळेही कर्जमाफीच्या मागणीसाठी सरसावली आहेत. थकीत कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम give loan apologies to corporations
‘महामंडळांनाही कर्जमाफी द्या’


शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महामंडळेही कर्जमाफीच्या मागणीसाठी सरसावली आहेत. थकीत कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीयांसाठी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, चर्मकार उद्योग महामंडळ, शबरी महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ आदी महामंडळांच्या माध्यमातून गरजूंना कर्जवाटप करण्यात आले. कर्जाची वेळेवर परतफेड झाली नाही. त्यामुळे महामंडळ कर्जबाजारी झाले. महामंडळांना पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी अध्यक्ष गमाजी घोडे, सुभाष रणखांबे, विठ्ठल कांबळे आदींनी केली आहे.

मातंग समाजाला जातीचे दाखले स्थानिक पातळीवर द्यावेत, अण्णा भाऊ महामंडळाद्वारे बंद पडलेली एनएसएफडीसी कर्ज प्रकरणे सुरू करण्यात यावीत, लहूजी साळवे आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, लहूजी साळवे व अण्णा भाऊ साठे जयंतीन‌िमित्त सरकारी सुटी जाहीर करावी, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे दोन हजार रुपये कोटी भागभांडवल वाढविण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर किशोर शिरसाठ, रवी डोंगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज