खडीच्या जैसे थे रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य
म. टा. वृत्तसेवा, सिडको
शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रिंगरोड करण्यात आले असले तरी गोविंदनगर येथून जाणारा रिंग रोड हा दोन्ही बाजूने अजूनही वादात आहे. याबाबत महापालिका व संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्यात वारंवार होणारे बदलामुळे नाशिककर हैराण झाले आहे.
गोविंदनगर भागातून जाणारा रिंग रोड हा सिटी सेंटर मॉल ते इंदिरानगरपर्यंत असून, या रस्त्याच्या सुरुवातीचाच भाग अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. संबंधित रस्त्याच्या जमीन मालकांशी सुरू असलेल्या वादामुळे वर्ष उलटूनही रस्ता डांबरीकरण झालेला नाही. खडीच्या या रस्त्यावर महापालिकेकडून महिन्यांतून किमान एकदा तरी सुधारणेचा प्रयत्न होत असतो. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. खडीच्या या रस्त्यामुळे येथे धुराळ्याचे कायमच साम्राज्य असते, तर खडी व खड्ड्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. मनोहर नगरकडून सिटीसेंटर मॉलकडे जाताना असलेल्या चौफुलीवरच हा रस्ता अर्धवट ठेवण्यात आला आहे.
डांबरीकरण नसल्याने या रस्त्यावरून वाहनांची येजा होताना खूपच धूळ उडत असते. या धुळीमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास झाला आहे तर काहीजणांना यामुळे श्वसनाचे आजारही सुरू झाल्याचे समजले आहे. शहराला वळसा न घालता लवकर इंदिरा नगरहून सातपूर, सिडकोकडे जाता यावे म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. त्यातच रात्रीच्यावेळी याठिकाणी पथदीपांचीही सोय नसल्याने अपघातही होत असतात. त्यामुळे हा रोड पालिकेने रिंगरोड केला असला तरी तो अर्धवट का ठेवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या रस्त्याचे तातडीने काम करून इतर रस्त्यांप्रमाणे याठिकाणीही डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
म. टा. वृत्तसेवा, सिडको
शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रिंगरोड करण्यात आले असले तरी गोविंदनगर येथून जाणारा रिंग रोड हा दोन्ही बाजूने अजूनही वादात आहे. याबाबत महापालिका व संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्यात वारंवार होणारे बदलामुळे नाशिककर हैराण झाले आहे.
गोविंदनगर भागातून जाणारा रिंग रोड हा सिटी सेंटर मॉल ते इंदिरानगरपर्यंत असून, या रस्त्याच्या सुरुवातीचाच भाग अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. संबंधित रस्त्याच्या जमीन मालकांशी सुरू असलेल्या वादामुळे वर्ष उलटूनही रस्ता डांबरीकरण झालेला नाही. खडीच्या या रस्त्यावर महापालिकेकडून महिन्यांतून किमान एकदा तरी सुधारणेचा प्रयत्न होत असतो. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. खडीच्या या रस्त्यामुळे येथे धुराळ्याचे कायमच साम्राज्य असते, तर खडी व खड्ड्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. मनोहर नगरकडून सिटीसेंटर मॉलकडे जाताना असलेल्या चौफुलीवरच हा रस्ता अर्धवट ठेवण्यात आला आहे.
डांबरीकरण नसल्याने या रस्त्यावरून वाहनांची येजा होताना खूपच धूळ उडत असते. या धुळीमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास झाला आहे तर काहीजणांना यामुळे श्वसनाचे आजारही सुरू झाल्याचे समजले आहे. शहराला वळसा न घालता लवकर इंदिरा नगरहून सातपूर, सिडकोकडे जाता यावे म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. त्यातच रात्रीच्यावेळी याठिकाणी पथदीपांचीही सोय नसल्याने अपघातही होत असतात. त्यामुळे हा रोड पालिकेने रिंगरोड केला असला तरी तो अर्धवट का ठेवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या रस्त्याचे तातडीने काम करून इतर रस्त्यांप्रमाणे याठिकाणीही डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.