नाशिक : रविवारी जिल्ह्यात पावसाने चार जणांचे बळी घेतले. संबंधित मृत व्यक्तींच्या नातलगांना सरकारद्वारे प्रत्येकी चार लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आज (दि. १६) दुपारपर्यंत ही मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे वीज अंगावर पडून अनिल गवे (वय ३२), सागर गवे (वय १७) व रोहित गायकवाड (वय १८) या तरुणांचा मृत्यू झाला. खडक ओझर (ता. चांदवड.) येथे वीज अंगावर पडल्याने जनाबाई सुभाष गिरी (वय ४०) ही महिला ठार झाली. या चारही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारी निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या निकषानुसार जनावरांच्या मालकांनाही मदत देण्यात येणार आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना आज मिळणार मदत
रविवारी जिल्ह्यात पावसाने चार जणांचे बळी घेतले संबंधित मृत व्यक्तींच्या नातलगांना सरकारद्वारे प्रत्येकी चार लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे...
MT 16 Apr 2019, 4:00 am