म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने चालू वर्षात घरपट्टीची बिले वेळेत नागरिकांना पोहचवल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत घसघशीत वाढ झाली आहे. पालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेचाही चांगला फायदा पालिकेला झाला असून, तीन महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीपोटी ३५ कोटी ६४ लाख, तर पाणीपट्टीतून ५ कोटी १० लाख जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टीची वसुली दुपटीने वाढली असून, पाणीपट्टीत एक कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तिमाहीतच ४० कोटींची भर पडली आहे.
महापालिकेने चालू वर्षी घरपट्टीचे ११० कोटी तर पाणीपट्टीतून ५० कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या वसुलीसाठी पालिका सरसावली असून, चालू वर्षी घरपट्टीच्या बिलाचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. शहरातील मालमत्तांची संख्या ही चार लाखांच्या वर, तर नळ कनेक्श्नची संख्या ही दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी निवडणूक कामांमुळे घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत मिळाली नाहीत. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला होता. परंतु, चालू वर्षी घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत पाठविण्यात आली. तसेच पालिकेने ग्राहकांसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेने एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरल्यास ५, मेमध्ये भरल्यास ३ आणि जूनमध्ये भरल्यास २ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
विकासकामांना आधार
चालू तिमाहीत २१ तारखेपर्यंत घरपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १७ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले होते. यावर्षी वसुली दुपटीने वाढली आहे. चालू तिमाहीत पाणीपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी १० लाख रुपये जमा झालेत. गेल्या वर्षी चार कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे यावर्षी एक कोटी रुपये अधिक वसुली झाली आहे. पहिल्या तिमाहीत पालिकेच्या तिजोरीत जवळपास चाळीस कोटी रुपये जमा झाल्याने विकासकामांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पाणीपट्टी बिलांचे आऊटसोर्सिग करण्याचा विचार प्रशासनाने पुन्हा सुरू केला आहे.
महापालिकेने चालू वर्षात घरपट्टीची बिले वेळेत नागरिकांना पोहचवल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत घसघशीत वाढ झाली आहे. पालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेचाही चांगला फायदा पालिकेला झाला असून, तीन महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीपोटी ३५ कोटी ६४ लाख, तर पाणीपट्टीतून ५ कोटी १० लाख जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टीची वसुली दुपटीने वाढली असून, पाणीपट्टीत एक कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तिमाहीतच ४० कोटींची भर पडली आहे.
महापालिकेने चालू वर्षी घरपट्टीचे ११० कोटी तर पाणीपट्टीतून ५० कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या वसुलीसाठी पालिका सरसावली असून, चालू वर्षी घरपट्टीच्या बिलाचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. शहरातील मालमत्तांची संख्या ही चार लाखांच्या वर, तर नळ कनेक्श्नची संख्या ही दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी निवडणूक कामांमुळे घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत मिळाली नाहीत. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला होता. परंतु, चालू वर्षी घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत पाठविण्यात आली. तसेच पालिकेने ग्राहकांसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेने एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरल्यास ५, मेमध्ये भरल्यास ३ आणि जूनमध्ये भरल्यास २ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
विकासकामांना आधार
चालू तिमाहीत २१ तारखेपर्यंत घरपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १७ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले होते. यावर्षी वसुली दुपटीने वाढली आहे. चालू तिमाहीत पाणीपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी १० लाख रुपये जमा झालेत. गेल्या वर्षी चार कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे यावर्षी एक कोटी रुपये अधिक वसुली झाली आहे. पहिल्या तिमाहीत पालिकेच्या तिजोरीत जवळपास चाळीस कोटी रुपये जमा झाल्याने विकासकामांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पाणीपट्टी बिलांचे आऊटसोर्सिग करण्याचा विचार प्रशासनाने पुन्हा सुरू केला आहे.