अ‍ॅपशहर

लखमापूरला वादळीवारा; ३२ घरांचे पत्रे उडाले

सटाणा ः तालुक्यातील लखमापूर येथे इंदिरा आवास योजनेतंर्गत बांधकाम करण्यात आलेल्या ३२ घरांवरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीव‌ितहानी झाली नाही.

Maharashtra Times 9 May 2017, 4:01 am
सटाणा ः तालुक्यातील लखमापूर येथे इंदिरा आवास योजनेतंर्गत बांधकाम करण्यात आलेल्या ३२ घरांवरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीव‌ितहानी झाली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम housr distroy in heavy wind
लखमापूरला वादळीवारा; ३२ घरांचे पत्रे उडाले


रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने या घरांचे पत्रे उडाल्याने वीजपुरवठा काही काळ बंद पडला होता. अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बांधण्यात आलेल्या इंदिरा आवास योजनेतील घरांचे बांधकाम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आक्काबाई चौधरी, लक्ष्मण मोरे, अभिमन जाधव, श्रावण पवार, संतोष पवार, निंबा गायकवाड, यांच्या खोल्यांचे नुकसान झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज