म. टा. प्रतिनिधी, नाशिक
व्हॉट्सअॅपवर दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्या सात जणांविरोधात तीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी शहर पोलिसांनी सात ग्रुप अॅडमीनला कायद्याच्या कचाट्यात घेतले आहे. ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून, सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे बालिकेच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअॅपवर चुकीचे तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे संदेश प्रसारीत करण्यात आले. या संदेशामुळेच ८ ऑक्टोबरपासून शहर, तसेच ग्रामीण भागात दंगलीचे लोण पसरले. चुकीची माहिती प्रसारीत होऊ नये, यासाठी गृह विभागाने १० ऑक्टोबरपासून मोबाइल इंटरनेट सेवा खंडित केली. तब्बल सहा दिवस ही सेवा बंद होती.
आकडा वाढणार
आतापर्यंत इगतपुरी पोलिसांनी दोन, वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये तीन, तर दिंडोरी पोलिस स्टेशनला एक असे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कलम १५३ नुसार कारवाई केली असून, यात आयटी अॅक्टचाही समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित गुन्हेगारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. शहर व ग्रामीण पोलिस दल मिळून १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
व्हॉट्सअॅपवर दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्या सात जणांविरोधात तीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी शहर पोलिसांनी सात ग्रुप अॅडमीनला कायद्याच्या कचाट्यात घेतले आहे. ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून, सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे बालिकेच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअॅपवर चुकीचे तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे संदेश प्रसारीत करण्यात आले. या संदेशामुळेच ८ ऑक्टोबरपासून शहर, तसेच ग्रामीण भागात दंगलीचे लोण पसरले. चुकीची माहिती प्रसारीत होऊ नये, यासाठी गृह विभागाने १० ऑक्टोबरपासून मोबाइल इंटरनेट सेवा खंडित केली. तब्बल सहा दिवस ही सेवा बंद होती.
आकडा वाढणार
आतापर्यंत इगतपुरी पोलिसांनी दोन, वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये तीन, तर दिंडोरी पोलिस स्टेशनला एक असे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कलम १५३ नुसार कारवाई केली असून, यात आयटी अॅक्टचाही समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित गुन्हेगारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. शहर व ग्रामीण पोलिस दल मिळून १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.