अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांनी जपावी सामाजिक बांधिलकी

विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन पालकांचा नावलौकिक वाढविला पाहिजे. जीवनात यशस्वी होऊन सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.

Maharashtra Times 22 Aug 2017, 4:49 am
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indira nagar
विद्यार्थ्यांनी जपावी सामाजिक बांधिलकी

विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन पालकांचा नावलौकिक वाढविला पाहिजे. जीवनात यशस्वी होऊन सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.
भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, अजय मित्र मंडळाचे संस्थापक सचिन कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, की सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी या सोशल मीडियाचा जीवनात चांगले बदल घडविण्यासाठी वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या मोबाइल गेमच्या माध्यमातून जीवनाची राखरांगोळी करण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे प्रगती करण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे.
नगरसेवक दिनकर पाटील यांनी राजकारणातील संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी योगेश पंचाक्षरी व अविनाश बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स, सायन्स व इंजिनीअरिंग क्षेत्रात कशी प्रगती करता याबाबतचे मार्गदर्शन केले. नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. स्नेहल काळे व मंजुषा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज