म. टा. प्रतिनिधी, सातपूर
आधीच दहा दिवस पुढे ढकललेल्या आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. यात ऑनलाइन अर्ज सादर केलेले विद्यार्थी पहाटेपासूनच आयटीआयच्या प्रवेशद्वारावर उभे असतात. परंतु, मूळ कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश अर्ज सादर केल्याची पावती घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक वेळ वाया जातो. यासाठी आयटीआय प्रशासनाने संगणकांची संख्या वाढवावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन झाले आहेत. परंतु ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यावर्षीदेखील प्रवेशासाठी १५ जून ते २९ जून तारीख देण्यात आली होती. परंतु आयटीआयचा सर्व्हरच डाऊन असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. यानंतर २७ जून ते १० जुलै या तारखांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश सुरू करण्यात आले. सायबर कॅफेवर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करताना ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. यात काही सायबर कॅफे चालकांकडून ग्रामीण विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसै देखील उकळले जातात. परंतु विद्यार्थ्यांचा नाईलाज असल्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य असते. त्यानंतरही मात्र आयटीआयमध्ये मूळ कागद पत्र घेऊन विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावेच लागते.
आधीच दहा दिवस पुढे ढकललेल्या आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. यात ऑनलाइन अर्ज सादर केलेले विद्यार्थी पहाटेपासूनच आयटीआयच्या प्रवेशद्वारावर उभे असतात. परंतु, मूळ कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश अर्ज सादर केल्याची पावती घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक वेळ वाया जातो. यासाठी आयटीआय प्रशासनाने संगणकांची संख्या वाढवावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन झाले आहेत. परंतु ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यावर्षीदेखील प्रवेशासाठी १५ जून ते २९ जून तारीख देण्यात आली होती. परंतु आयटीआयचा सर्व्हरच डाऊन असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली. यानंतर २७ जून ते १० जुलै या तारखांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश सुरू करण्यात आले. सायबर कॅफेवर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करताना ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. यात काही सायबर कॅफे चालकांकडून ग्रामीण विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसै देखील उकळले जातात. परंतु विद्यार्थ्यांचा नाईलाज असल्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य असते. त्यानंतरही मात्र आयटीआयमध्ये मूळ कागद पत्र घेऊन विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावेच लागते.