म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ व २३ मे रोजी, राज्यस्तरीय प्रवचन आणि कीर्तनकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, पौर्णिमा स्टॉपसमोर, द्वारका येथे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून किमान एक हजार प्रवचन व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी १० वाजता मी स्वहिंदू या ग्र्रंथाचे वाचन आणि हिंदू धर्मातील वर्ण जातीची अट नसलेल्या स्वहिंदू विवाह मंच या संकेतस्थळाचे उदघाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्याहस्ते होईल. त्यानंतर ‘जातिनिर्मूलन काळाची गरज’ या विषयावर ते विचार मांडणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाजमंथन या कार्यक्रमांतर्गत सर्वांसाठी खुल्या चर्चासत्र होईल. एकसंघ हिंदू समाजासाठी जातिनिर्मूलन ही काळाची गरज, हिंदुत्वाबद्दल समाजात असलेले अज्ञान दूर करणे, दिशाहीन युवापिढी, नैतिक अध:पतन आणि भ्रष्टाचार हे चर्चासत्राचे मुख्य विषय आहेत. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उपस्थित राहतील. चर्चासत्राचे समन्वयक म्हणून दामोदर महाराज गावले, पंडित गुरुजी, लक्ष्मण महाराज पाटील, महंत आयुर्वेदाचार्य माधवानंद सरस्वती महाराज असतील.
समाजमंथन कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संमेलनातील या चर्चासत्रातील उपरोक्त सामाजिक प्रश्नांवर सुचविल्या जाणाऱ्या प्रत्येक योग्य विचारांची अंमलबजावणी करून एकसंघ व सुसंस्कृत समाज घडविणे हाच स्वहिंदू संस्थेचा मुख्य कार्यभाग आहे. संमेलनासाठी आलेल्या प्रवचन व कीर्तनकारांची भोजनाची व निवासाची व्यवस्था स्वहिंदू संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे. संमेलन सर्वांसाठी नि:शुल्क असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा. संतांनी चालवलेला समाज प्रबोधनाचा वारसा पुढे सातत्याने प्रवाही ठेवावा, असे आवाहन संस्थेचे प्रवक्ते बी. टी. इंगळे यांनी केले आहे.
स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ व २३ मे रोजी, राज्यस्तरीय प्रवचन आणि कीर्तनकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, पौर्णिमा स्टॉपसमोर, द्वारका येथे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून किमान एक हजार प्रवचन व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी १० वाजता मी स्वहिंदू या ग्र्रंथाचे वाचन आणि हिंदू धर्मातील वर्ण जातीची अट नसलेल्या स्वहिंदू विवाह मंच या संकेतस्थळाचे उदघाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्याहस्ते होईल. त्यानंतर ‘जातिनिर्मूलन काळाची गरज’ या विषयावर ते विचार मांडणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाजमंथन या कार्यक्रमांतर्गत सर्वांसाठी खुल्या चर्चासत्र होईल. एकसंघ हिंदू समाजासाठी जातिनिर्मूलन ही काळाची गरज, हिंदुत्वाबद्दल समाजात असलेले अज्ञान दूर करणे, दिशाहीन युवापिढी, नैतिक अध:पतन आणि भ्रष्टाचार हे चर्चासत्राचे मुख्य विषय आहेत. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उपस्थित राहतील. चर्चासत्राचे समन्वयक म्हणून दामोदर महाराज गावले, पंडित गुरुजी, लक्ष्मण महाराज पाटील, महंत आयुर्वेदाचार्य माधवानंद सरस्वती महाराज असतील.
समाजमंथन कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संमेलनातील या चर्चासत्रातील उपरोक्त सामाजिक प्रश्नांवर सुचविल्या जाणाऱ्या प्रत्येक योग्य विचारांची अंमलबजावणी करून एकसंघ व सुसंस्कृत समाज घडविणे हाच स्वहिंदू संस्थेचा मुख्य कार्यभाग आहे. संमेलनासाठी आलेल्या प्रवचन व कीर्तनकारांची भोजनाची व निवासाची व्यवस्था स्वहिंदू संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे. संमेलन सर्वांसाठी नि:शुल्क असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा. संतांनी चालवलेला समाज प्रबोधनाचा वारसा पुढे सातत्याने प्रवाही ठेवावा, असे आवाहन संस्थेचे प्रवक्ते बी. टी. इंगळे यांनी केले आहे.