अ‍ॅपशहर

पुलाची ‘पोलखोल’

गेल्या आठवड्यात अभोणा परिसरात झालेल्या पावसाने आदिवासी बांधकाम विभागाने केलेल्या कामचलाऊ ‘कामकाजा’ची पोलखोल केली आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalwan bridge in bad condiction
पुलाची ‘पोलखोल’


गेल्या आठवड्यात अभोणा परिसरात झालेल्या पावसाने आदिवासी बांधकाम विभागाने केलेल्या कामचलाऊ ‘कामकाजा’ची पोलखोल केली आहे. बांधकाम विभागाने भूमिगत गटारी बनवून पावसाचे पाणी जाण्यास कुठलीही सोय न केल्याने अभोणा-कळवण रोडला जोडणारा महत्त्वाच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पावसात रस्त्याचे नाले झाल्यासारखी स्थिती झाली होती.

या पुलाच्या दोनी बाजुचा भराव पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला पूल सध्या अधिकच धोकेदायक झाला आहे. उरलेल्या अडीच महिन्याच्या पावसाळ्यात या पुलाची काय अवस्थ होईल, यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाळा सुरू झाला आहे. पहिल्याच पावसात या पुलाचे ‘बांधकाम’ उघडकीस आले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत का पूल तग धरणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

होत आहे.

अभोणासह पाश्चिम पट्ट्यातील आदिवासींना संपूर्ण ‘कसमादेना’ला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने त्याचे महत्त्व अजुनच वाढले आहे. पुलाला काही नुकसान झाल्यास पाश्चिम पट्ट्यातील गावांचा कळवणशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर पुलाची लवकर डागडुजी करून पावसाचे पाणी रस्त्यावर न येता नाल्यात जाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज