अ‍ॅपशहर

कोजागरीला अवतरले चैतन्य

कोजागरी पौणिमेनिमित्त गुरुवारी दोन लाख भाविकांनी गर्दी केल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड परिसर भगवामय झाला. देवीच्या जागरण गोंधळाने चैतन्याची उधळण झाली. अभिषेकासाठी राज्यभरातून आलेल्या कावडीधारकांचे जल आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात आले.

Maharashtra Times 6 Oct 2017, 4:07 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kojagiri saptashring gad
कोजागरीला अवतरले चैतन्य

कोजागरी पौणिमेनिमित्त गुरुवारी दोन लाख भाविकांनी गर्दी केल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड परिसर भगवामय झाला. देवीच्या जागरण गोंधळाने चैतन्याची उधळण झाली. अभिषेकासाठी राज्यभरातून आलेल्या कावडीधारकांचे जल आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात आले.
पहाटेपासून कावड धारकांसह भाविकांची गर्दी झाल्याने सप्तशृंगगड परिसर गजबजून गेला. भकत म्हणून आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सपत्नीक आणि देणगीदार भाविक गुलशन पटेल यांच्या हस्ते पंचामृत महापूजा करण्यात आली. गुरूवारी सकाळी १० वाजेपासून कावडीधारकांसह भाविकांनी शिवालय तलावर गर्दी केली. आपापपल्या गटासोबत देवीच्या मंदिराकडे येताना दिसत होते. मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने दुपारी पायऱ्यामध्ये १५ ठिकाणी बाऱ्या लावून भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. संस्थांनच्या प्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभरात ३० ते ३५ हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. कावडीधारकांना सायंकाळी ७ वाजेनंतर देवीच्या अभिषेकासाठी शिप्रा, गोदावरी, नर्मदा, गंगा, जमुना, कावेरी, मुळा, मुठा, रामेश्वर, इद्रांयणी आदी पवित्र नद्यांचे जल घेण्यासाठी संस्थानमार्फत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या सर्व नद्यांचे जल एकत्र करून सकाळी १० वाजता देवीच्या अभिषेकास सुरुवात करण्यात आली. यानंतर दुपारी १२ वाजता देवीची आरती होऊन कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र बोल मेरी अंबे, प्रेम से बोलो जय मातादी, सप्तश्रृंगी माता की जय, परशराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

तृतीयपंथींचा जागर
श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावर कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. तृतीयपंथींकडून कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले. तसेच ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथींनीही नृत्य केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज