मुंबई-नाशिक वाहतूक काही काळ ठप्प
म. टा. वृत्तसेवा, घोटी
कसाराजवळ झालेला रेल्वे अपघात, अतिवृष्टीमुळे मुंबईत जाणारी वाहतूक महामार्गावरच रोखली गेल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. त्यात बुधवारी पहाटे कसारा घाटात मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले होते.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाट महामार्गाच्या कडेला बुधवारी पहाटे दरड कोसळली. मात्र यात कोणतीही जीवित, वित्तहानी झाली नाही. या मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांनी पिक इंफ्रा एक्स्प्रेस वे टोल प्लाझा येथे माहिती देताच टोल प्लाझाचे रस्ता सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅरिकेड्स लावून मार्ग काही काळ बंद करण्यात आला. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दगड बाजूला करून वाहतूक एका बाजूने संथगतीने सुरू करण्यात आली. यावेळी महामार्ग पोलिस सुरक्षा कर्मचारी आणि पिक इंफ्रा मुंबई नाशिक एक्स्प्रेस वेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. दुपारी दीड वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कंपनीचे सुरक्षा अधिकारी विजय राठोड, कर्मचारी उमेर शेख, सचिन भडांगे, शिवा कातोरे, जावेद खान, वसिम शेख, संदीप म्हसणे, राजू मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले. जेसीबीच्या साहाय्याने दीड तास युद्धपातळीवर काम करून मलबा हटविण्यात आला.
म. टा. वृत्तसेवा, घोटी
कसाराजवळ झालेला रेल्वे अपघात, अतिवृष्टीमुळे मुंबईत जाणारी वाहतूक महामार्गावरच रोखली गेल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. त्यात बुधवारी पहाटे कसारा घाटात मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले होते.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाट महामार्गाच्या कडेला बुधवारी पहाटे दरड कोसळली. मात्र यात कोणतीही जीवित, वित्तहानी झाली नाही. या मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांनी पिक इंफ्रा एक्स्प्रेस वे टोल प्लाझा येथे माहिती देताच टोल प्लाझाचे रस्ता सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅरिकेड्स लावून मार्ग काही काळ बंद करण्यात आला. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दगड बाजूला करून वाहतूक एका बाजूने संथगतीने सुरू करण्यात आली. यावेळी महामार्ग पोलिस सुरक्षा कर्मचारी आणि पिक इंफ्रा मुंबई नाशिक एक्स्प्रेस वेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. दुपारी दीड वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कंपनीचे सुरक्षा अधिकारी विजय राठोड, कर्मचारी उमेर शेख, सचिन भडांगे, शिवा कातोरे, जावेद खान, वसिम शेख, संदीप म्हसणे, राजू मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले. जेसीबीच्या साहाय्याने दीड तास युद्धपातळीवर काम करून मलबा हटविण्यात आला.