pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT
नाशिक :
फुलोंपे दुनिया सोती है फुलोंपे दुनिया चलती है
कांटोपर भी चलकर देखो, कांटो की भी आत्मा होती है
काट्याला केवळ टोचणेच माहीत अशी समाजमनाची धारणा असताना काट्यालाही आत्मा असतो एवढी हळवी मानसिकता जपणारे लक्ष्मण नामदेव गणवीर. ६५ वर्षे वय असलेल्या या तरुण तुर्काने आतापर्यंत १३ हजार किलोमीटर पायी तीर्थाटन केले आहे. चालण्याचा उद्देश एकच. तो म्हणजे सद्भावना, शांती अन् एकतेचा संदेश देणे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या गणवीर यांचा एकूणच प्रवास अन् विचारधारा थक्क करणारी आहे.
गणवीर हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूरचे. वाजंत्री हा त्यांचा मूळ व्यवसाय. कुटुंबाच्या उपजीविकेचेही हेच साधन. तीर्थाटनातून शांती, मानवता, एकता आणि सद्भावनेचे आवाहन ते गेली ४२ वर्षे करीत आहेत. १९७६ ला त्यांनी विश्व राष्ट्रीय एकता कावड यात्रा सुरू केली. आजतागायत त्यांनी विविध मार्गांवर तब्बल ३८ पदयात्रा केल्या आहेत. त्याही अनवाणी पायांनी. साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्या उत्साहाचा झरा आटलेला नाही. एक वर्ष समाजासाठी अन् एक वर्ष कुटुंबासाठी असा त्यांचा वार्षिक क्रम ठरलेला आहे. हातात ढोल, पिपाणी, डोक्यावर तिरंगी टोपी असा तब्बल ३० किलोंचा भार घेऊन २९ जुलै २०१९ रोजी ते इंदूरहून मार्गस्थ झाले. देवास, उज्जैन, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, सेंधवा, धार, माँ बिजासनी, धुळ्यातील एकवीरा देवी मंदिर, वणी गड या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन ते नुकतेच नाशिक शहरात दाखल झाले. पत्नीचे निधन झालेले. विवाहीत दोन मुले आणि दोन मुली असलेले गणवीर सांसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्याचे सांगतात. उर्वरीत आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केले आहे.
राष्ट्रगीत गाऊन सन्मानाने उतरवतात तिरंगी टोपी
त्यांचे वाक्य न् वाक्य देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले. त्यांच्या कृतीमधूनही देशप्रेमाची प्रचिती येते. सकाळी ते डोक्यावर तिरंगी टोपी परिधान करतात. सायंकाळी ध्वज उतरविण्याच्या वेळेला ढोल आणि पिपाणीवर राष्ट्रगीत गाऊन सन्मानाने ही टोपी उतरवतात. त्यानंतर पायी प्रवासही थांबवितात. सार्वजनिक ठिकाणी मुक्काम करतात. प्रवासादरम्यान शाळा, महाविद्यालयांना भेट द्यायची. पिपाणीवर देशभक्तीपर गीते गायची. इतकेच नव्हे तर विविध पक्ष्यांचे आवाजही काढून दाखवित मनोरंजन करतात. प्रवासात कुणाकडे काहीही मागायचे नाही, हा शिरस्ता त्यांनी जपला आहे. कुणी स्वत:हून अन्न, पाणी व आर्थिक मदत दिली तर त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतात. परंतु, हे धनही स्वत:साठी न ठेवण्याची त्यांची वृत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती, सीमारेषेवरील हल्ला यांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी ते हे धन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करतात. त्याबाबतची प्रमाणपत्रेही त्यांच्याकडे पहावयास मिळतात.
अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता
या कावड यात्रेदरम्यान गणवीर जेथे जातील तेखील जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतात. त्यांना आपल्या कार्याची माहिती देतात. अधिकारी समाज हिताचे कार्य करीत असल्याबाबत त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. कोणतीही अपेक्षा न बाळगता त्यांच्याकडून सदिच्छा स्वीकारत निरोप घेतात. आतापर्यंत प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांची गणवीर यांनी भेट घेतली आहे.
Tweet : BidvePravinMT
नाशिक :
फुलोंपे दुनिया सोती है फुलोंपे दुनिया चलती है
कांटोपर भी चलकर देखो, कांटो की भी आत्मा होती है
काट्याला केवळ टोचणेच माहीत अशी समाजमनाची धारणा असताना काट्यालाही आत्मा असतो एवढी हळवी मानसिकता जपणारे लक्ष्मण नामदेव गणवीर. ६५ वर्षे वय असलेल्या या तरुण तुर्काने आतापर्यंत १३ हजार किलोमीटर पायी तीर्थाटन केले आहे. चालण्याचा उद्देश एकच. तो म्हणजे सद्भावना, शांती अन् एकतेचा संदेश देणे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या गणवीर यांचा एकूणच प्रवास अन् विचारधारा थक्क करणारी आहे.
गणवीर हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूरचे. वाजंत्री हा त्यांचा मूळ व्यवसाय. कुटुंबाच्या उपजीविकेचेही हेच साधन. तीर्थाटनातून शांती, मानवता, एकता आणि सद्भावनेचे आवाहन ते गेली ४२ वर्षे करीत आहेत. १९७६ ला त्यांनी विश्व राष्ट्रीय एकता कावड यात्रा सुरू केली. आजतागायत त्यांनी विविध मार्गांवर तब्बल ३८ पदयात्रा केल्या आहेत. त्याही अनवाणी पायांनी. साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्या उत्साहाचा झरा आटलेला नाही. एक वर्ष समाजासाठी अन् एक वर्ष कुटुंबासाठी असा त्यांचा वार्षिक क्रम ठरलेला आहे. हातात ढोल, पिपाणी, डोक्यावर तिरंगी टोपी असा तब्बल ३० किलोंचा भार घेऊन २९ जुलै २०१९ रोजी ते इंदूरहून मार्गस्थ झाले. देवास, उज्जैन, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, सेंधवा, धार, माँ बिजासनी, धुळ्यातील एकवीरा देवी मंदिर, वणी गड या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन ते नुकतेच नाशिक शहरात दाखल झाले. पत्नीचे निधन झालेले. विवाहीत दोन मुले आणि दोन मुली असलेले गणवीर सांसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्याचे सांगतात. उर्वरीत आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केले आहे.
राष्ट्रगीत गाऊन सन्मानाने उतरवतात तिरंगी टोपी
त्यांचे वाक्य न् वाक्य देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले. त्यांच्या कृतीमधूनही देशप्रेमाची प्रचिती येते. सकाळी ते डोक्यावर तिरंगी टोपी परिधान करतात. सायंकाळी ध्वज उतरविण्याच्या वेळेला ढोल आणि पिपाणीवर राष्ट्रगीत गाऊन सन्मानाने ही टोपी उतरवतात. त्यानंतर पायी प्रवासही थांबवितात. सार्वजनिक ठिकाणी मुक्काम करतात. प्रवासादरम्यान शाळा, महाविद्यालयांना भेट द्यायची. पिपाणीवर देशभक्तीपर गीते गायची. इतकेच नव्हे तर विविध पक्ष्यांचे आवाजही काढून दाखवित मनोरंजन करतात. प्रवासात कुणाकडे काहीही मागायचे नाही, हा शिरस्ता त्यांनी जपला आहे. कुणी स्वत:हून अन्न, पाणी व आर्थिक मदत दिली तर त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतात. परंतु, हे धनही स्वत:साठी न ठेवण्याची त्यांची वृत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती, सीमारेषेवरील हल्ला यांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी ते हे धन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करतात. त्याबाबतची प्रमाणपत्रेही त्यांच्याकडे पहावयास मिळतात.
अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता
या कावड यात्रेदरम्यान गणवीर जेथे जातील तेखील जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतात. त्यांना आपल्या कार्याची माहिती देतात. अधिकारी समाज हिताचे कार्य करीत असल्याबाबत त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. कोणतीही अपेक्षा न बाळगता त्यांच्याकडून सदिच्छा स्वीकारत निरोप घेतात. आतापर्यंत प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांची गणवीर यांनी भेट घेतली आहे.