म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विल्होळी येथील सारुळ गावात बिबट्याला कैद करण्यासाठी आठ दिवसांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.१०) सकाळी प्रौढ बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्या कैद झाला असला तरी ग्रामस्थांमधील अद्याप कमी झाले नसून वन विभागाने परिसरात गस्त कायम ठेवली आहे.
गेल्या आठवड्यात गणपत शंकर नवले यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकली. सकाळी शेतकऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना माहिती दिली. माहिती मिळताच भदाणे यांनी वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजय पाटील, सुनील खानझोडे यांना बिबट्या अडकलेला पिंजरा ताब्यात घेण्यासाठी त्वरित रवाना केले. बिबट्याची मादी पूर्णपणे सुदृढ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच या मादीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.
विल्होळी येथील सारुळ गावात बिबट्याला कैद करण्यासाठी आठ दिवसांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.१०) सकाळी प्रौढ बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्या कैद झाला असला तरी ग्रामस्थांमधील अद्याप कमी झाले नसून वन विभागाने परिसरात गस्त कायम ठेवली आहे.
गेल्या आठवड्यात गणपत शंकर नवले यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकली. सकाळी शेतकऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना माहिती दिली. माहिती मिळताच भदाणे यांनी वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजय पाटील, सुनील खानझोडे यांना बिबट्या अडकलेला पिंजरा ताब्यात घेण्यासाठी त्वरित रवाना केले. बिबट्याची मादी पूर्णपणे सुदृढ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच या मादीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.