म. टा. वृत्तसेवा, निफाड
येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी थ्री फेज विद्युत तार खाली लोंबकळत असल्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निमार्ण झाला आहे. याबाबत तोंडी आणि लेखी मागणी करून सहा महिने उलटले तरीही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर तारा ओढणार का? असा सवाल आता शेतकरी कंपनीला विचारत आहेत.
निफाड-पिंपळगाव राज्य मार्गालागत शरद शंकर उबाळे (वय ३२) यांची गट नं १०५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या थ्री फेज वायर गेल्या आहेत. या वायर हाताला लागतील अशा पाच फुटापर्यंत खाली आल्या आहेत. याबाबत उबाळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली देवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. उबाळे यांनी २२ डिसेंबर २०१६ रोली लेखी पत्राद्वारेही विनंती केली. तरीही कंपनीने शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
याबाबत निफाड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ठेकेदाराला सांगितले आहे. वरच्या ऑफिसलाही कळविले आहे, अशी उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. उबाळे यांनी कंपनीच्या कारभाराला कंटाळून तारांना स्पर्श होऊन म्हणून पेरणीही थांबविली आहे.
येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी थ्री फेज विद्युत तार खाली लोंबकळत असल्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निमार्ण झाला आहे. याबाबत तोंडी आणि लेखी मागणी करून सहा महिने उलटले तरीही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर तारा ओढणार का? असा सवाल आता शेतकरी कंपनीला विचारत आहेत.
निफाड-पिंपळगाव राज्य मार्गालागत शरद शंकर उबाळे (वय ३२) यांची गट नं १०५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या थ्री फेज वायर गेल्या आहेत. या वायर हाताला लागतील अशा पाच फुटापर्यंत खाली आल्या आहेत. याबाबत उबाळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली देवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. उबाळे यांनी २२ डिसेंबर २०१६ रोली लेखी पत्राद्वारेही विनंती केली. तरीही कंपनीने शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
याबाबत निफाड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ठेकेदाराला सांगितले आहे. वरच्या ऑफिसलाही कळविले आहे, अशी उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. उबाळे यांनी कंपनीच्या कारभाराला कंटाळून तारांना स्पर्श होऊन म्हणून पेरणीही थांबविली आहे.