म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याने राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ऐन खरिप हंगामातच कृषिपंपांवर दोन तासांच्या आतिरिक्त वीज भारनियमनाचा भार टाकण्यात आल्याने शेतकरी वर्गाला महावितरणने पुन्हा शॉक दिला आहे.
राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व रात्री आठ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री दहापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री सहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीजखरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कोळसा उपलब्ध करण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करीत आहेत.
कृषिला दुय्यम स्थान
राज्यात तांत्रिक अडचणीमुळे विजेच्या उपलब्धतेत कमतरता निर्माण होते त्या वेळी कृषी वीज ग्राहकांवर भारनियमनाचा भार टाकण्यास प्राधान्य दिले जाते. या प्रकारामुळे सरकार व महावितरण कंपनी कृषीला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे उत्पादनात घट आल्याने वीज उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून महावितरणने तात्पुरते भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा भार शेतकऱ्यांवरच टाकण्यात आला आहे. पूर्वी १८ तास दोन टप्प्यात चक्राकार पद्धतीने अखंडित वीजपुरवठा कृषी ग्राहकांना केला जात असे. आता पुरेशी उपलब्धता होईपर्यंत दोन टप्प्यात आठ-आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.
वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याने राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ऐन खरिप हंगामातच कृषिपंपांवर दोन तासांच्या आतिरिक्त वीज भारनियमनाचा भार टाकण्यात आल्याने शेतकरी वर्गाला महावितरणने पुन्हा शॉक दिला आहे.
राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व रात्री आठ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री दहापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री सहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीजखरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कोळसा उपलब्ध करण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करीत आहेत.
कृषिला दुय्यम स्थान
राज्यात तांत्रिक अडचणीमुळे विजेच्या उपलब्धतेत कमतरता निर्माण होते त्या वेळी कृषी वीज ग्राहकांवर भारनियमनाचा भार टाकण्यास प्राधान्य दिले जाते. या प्रकारामुळे सरकार व महावितरण कंपनी कृषीला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे उत्पादनात घट आल्याने वीज उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून महावितरणने तात्पुरते भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा भार शेतकऱ्यांवरच टाकण्यात आला आहे. पूर्वी १८ तास दोन टप्प्यात चक्राकार पद्धतीने अखंडित वीजपुरवठा कृषी ग्राहकांना केला जात असे. आता पुरेशी उपलब्धता होईपर्यंत दोन टप्प्यात आठ-आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.