म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी प्रवास करीत मंगळवारी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चची सुरुवात शालिमार चौकातून होणार असून, तो विधानसभेवर धडकणार आहे. मोर्चात राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार असून, ते विधानभवनाला घेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव राहणार आहे.
लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ६० हजार, तर उर्वरित राज्यांतून ४० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व शेतकरी आपल्या शिध्याची व्यवस्था स्वत:च करणार आहेत. शेती संकटामुळे शेतकरी वर्ग हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फसव्या घोषणा करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे किसान सभेचा हा आरपार लढा असल्याचे किसान मोर्चच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोर्चात वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. किसान सभेचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
मोर्चाचे नियोजन असे
७ मार्च
दुपारचे भोजन खंबाळे (ता. इगतपुरी) जवळ
रात्री मुक्काम घाटणदेवी (ता. इगतपुरी)
८ मार्च
दुपारचे भोजन साईधाम, साई ढाब्याजवळ, कसारा (ता. शहापूर)
रात्री मुक्काम कळंबगाव (ता. शहापूर)
९ मार्च
दुपारचे जेवण आसनगाव (ता. शहापूर)
रात्री मुक्काम भातसा नदीवर
१० मार्च
दुपारचे भोजन भिनार (ता. भिवंडी)
रात्री मुक्काम मुंबई ढाबा (ता. ठाणे)
११ मार्च
दुपारचे भोजन विक्रोळी/घाटकोपर
रात्री मुक्काम सायन/दादरजवळ
१२ मार्च
सायन/दादरहून विधानभवनाकडे कूच
किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी प्रवास करीत मंगळवारी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चची सुरुवात शालिमार चौकातून होणार असून, तो विधानसभेवर धडकणार आहे. मोर्चात राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार असून, ते विधानभवनाला घेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव राहणार आहे.
लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ६० हजार, तर उर्वरित राज्यांतून ४० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व शेतकरी आपल्या शिध्याची व्यवस्था स्वत:च करणार आहेत. शेती संकटामुळे शेतकरी वर्ग हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फसव्या घोषणा करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे किसान सभेचा हा आरपार लढा असल्याचे किसान मोर्चच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोर्चात वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. किसान सभेचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
मोर्चाचे नियोजन असे
७ मार्च
दुपारचे भोजन खंबाळे (ता. इगतपुरी) जवळ
रात्री मुक्काम घाटणदेवी (ता. इगतपुरी)
८ मार्च
दुपारचे भोजन साईधाम, साई ढाब्याजवळ, कसारा (ता. शहापूर)
रात्री मुक्काम कळंबगाव (ता. शहापूर)
९ मार्च
दुपारचे जेवण आसनगाव (ता. शहापूर)
रात्री मुक्काम भातसा नदीवर
१० मार्च
दुपारचे भोजन भिनार (ता. भिवंडी)
रात्री मुक्काम मुंबई ढाबा (ता. ठाणे)
११ मार्च
दुपारचे भोजन विक्रोळी/घाटकोपर
रात्री मुक्काम सायन/दादरजवळ
१२ मार्च
सायन/दादरहून विधानभवनाकडे कूच