अ‍ॅपशहर

नाशिक: १ लाख रुपये किंमतीचा कांदा चोरीला

कांद्याचे दर वाढत असतानाच, नाशिकमधील एका शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यानं साठवणूक केलेला तब्बल एक लाख रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पोलिसांत तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2019, 1:52 pm
नाशिक: कांद्याचे दर वाढत असतानाच, नाशिकमधील एका शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यानं साठवणूक केलेला तब्बल एक लाख रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पोलिसांत तक्रार दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Onion


कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी राहुल बाजीराव पगार यांनी सोमवारी कांदा चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिली. पगार यांनी त्यांच्या गोदामात ११७ क्रेट्समध्ये २५ टन कांदा साठवून ठेवला होता. या साठ्यामधील एक लाख रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेल्याचं रविवारी संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पगार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरीला गेलेला कांदा स्थानिक बाजार आणि गुजरातमधील बाजारांमध्ये विक्रीसाठी नेला आहे का, याचा तपास सुरू आहे, असं पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितलं. तर देवळा तालुक्यातील भऊर येथील शेतकरी विष्णू बापू आहेर यांच्या मालकीच्या शेतातील कांदा चाळीत काही समाजकंटकांनी रासायनिक युरिया टाकल्याने शेतकऱ्याचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कधी नव्हे बळीराजाच्या तोंडात जाणारा सुखाचा घास हिरावला गेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज