राज्य समितीचा पाहणी दौरा, अहवालानुसार घोषणा; पंधरा कोटींचे अनुदान खर्च
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मालेगाव महापालिकेकडून शहर हागणदारीमुक्त मोहीम हाती घेण्यात आली होती. पालिका प्रशासनाच्या या मोहिमेला यश आले आहे. राज्य समितीच्या पाहणी दौरा व अहवालानुसार राज्य शासनाने मालेगाव महानगरपालिका हागणदारीमुक्त घोषित केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.
महापालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी वरील माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू होती. शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल आयुक्त संगीता धायगुडे यांनी राज्य शासनास पाठविल्यानंतर सोमवारी सायंकाळी राज्यस्तरीय पाच सदस्यीय समिती पाहणीसाठी शहरात दाखल झाली होती.
या समितीने सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पाहणीदौरा करून आपला अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. या अहवालानुसार नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मालेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले.
मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. मात्र नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाने घेतलेली मेहनत यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यश आले. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, सर्व नगरसवेक, नागरिक, पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांचे आयुक्तांनी आभार मानले. तसेच, शहरात राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त मोहिमेबद्दल यावेळी त्यांनी प्रेझेंटेशन सादर केले. हागणदारीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहावित यासाठी त्या ठिकाणी वृक्षारोपण, क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अभिजीत पवार यांनी प्रेझेंटेशनद्वारे राबविण्यात आलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपायुक्त कामारुद्दीन शेख, विलास गोसावी, अंबादास गरकल, राजू खैरनार, नगरसचिव राजेश धसे आदींसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
केंद्राला अहवाल पाठविणार
राज्यस्तरीय समितीच्या पाहणीदौऱ्यानंतर केंद्र शासनास याबाबत राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. लवकरच केंद्राची क्यूसीआय समिती मालेगाव शहरात पाहणीसाठी येणार असून, या क्यूसीआय समितीद्वारेदेखील शहर हागणदारीमुक्त घोषित व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त धायगुडे यांनी सांगितले.
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मालेगाव महापालिकेकडून शहर हागणदारीमुक्त मोहीम हाती घेण्यात आली होती. पालिका प्रशासनाच्या या मोहिमेला यश आले आहे. राज्य समितीच्या पाहणी दौरा व अहवालानुसार राज्य शासनाने मालेगाव महानगरपालिका हागणदारीमुक्त घोषित केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.
महापालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी वरील माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू होती. शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल आयुक्त संगीता धायगुडे यांनी राज्य शासनास पाठविल्यानंतर सोमवारी सायंकाळी राज्यस्तरीय पाच सदस्यीय समिती पाहणीसाठी शहरात दाखल झाली होती.
या समितीने सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पाहणीदौरा करून आपला अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. या अहवालानुसार नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मालेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले.
मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. मात्र नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाने घेतलेली मेहनत यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यश आले. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, सर्व नगरसवेक, नागरिक, पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांचे आयुक्तांनी आभार मानले. तसेच, शहरात राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त मोहिमेबद्दल यावेळी त्यांनी प्रेझेंटेशन सादर केले. हागणदारीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहावित यासाठी त्या ठिकाणी वृक्षारोपण, क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अभिजीत पवार यांनी प्रेझेंटेशनद्वारे राबविण्यात आलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपायुक्त कामारुद्दीन शेख, विलास गोसावी, अंबादास गरकल, राजू खैरनार, नगरसचिव राजेश धसे आदींसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
केंद्राला अहवाल पाठविणार
राज्यस्तरीय समितीच्या पाहणीदौऱ्यानंतर केंद्र शासनास याबाबत राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. लवकरच केंद्राची क्यूसीआय समिती मालेगाव शहरात पाहणीसाठी येणार असून, या क्यूसीआय समितीद्वारेदेखील शहर हागणदारीमुक्त घोषित व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त धायगुडे यांनी सांगितले.