राज्यमंत्री दादा भुसेंचे आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील मनपाच्या सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या दोनशे शिक्षकांच्या हक्काचे पेन्शनचे व अन्य बाबीचे एकूण साडेबारा कोटी रुपये इतकी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार मनपा प्रशासनास पाठपुरावा करण्यात आला. मात्र तरीही ही थकीत रक्कम अदा करण्यात आली नसल्यामुळे या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रश्नी दादा भुसे यांनी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
मालेगाव मनपातील सुमारे दोनशे शिक्षकांची एकूण १२.५ कोटी रुपये थकबाकी झाली आहे. सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान व पेन्शन रक्कम ३ कोटी, सहाव्या वेतन आयोगाचे फरकाचे ३ कोटी व अन्य बाबींचे असे एकूण १२.५ कोटी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. यातील राज्य सरकारच्या वाट्याची ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. मात्र मनपाकडून अद्याप थकीत रक्कम न मिळाल्याने संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
याबाबत गेल्या ६ ते ७ वर्षांपासून सेवानिवृत्त शिक्षक व तालुका पेन्शन संघटना प्रयत्न करीत आहेत. मात्र मनपामधील अधिकारी व आयुक्त यांना निवेदन देऊनदेखील रक्कम मिळालेली नाही.
याप्रश्नी शिष्टमंडळाने राज्यमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात कुरेशी गुलाम हैदर, सलाउद्दीन यासीम, अल्ताफ अहमद, जगन्नाथ जयराम आदी उपस्थित होते. चर्चेत मनपाला थकीत रक्कम देण्यासंबंधी दहा दिवसांचा आत बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले, अशी माहिती अध्यक्ष बी. के. नागपुरे यांनी दिली.
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील मनपाच्या सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या दोनशे शिक्षकांच्या हक्काचे पेन्शनचे व अन्य बाबीचे एकूण साडेबारा कोटी रुपये इतकी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार मनपा प्रशासनास पाठपुरावा करण्यात आला. मात्र तरीही ही थकीत रक्कम अदा करण्यात आली नसल्यामुळे या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रश्नी दादा भुसे यांनी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
मालेगाव मनपातील सुमारे दोनशे शिक्षकांची एकूण १२.५ कोटी रुपये थकबाकी झाली आहे. सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान व पेन्शन रक्कम ३ कोटी, सहाव्या वेतन आयोगाचे फरकाचे ३ कोटी व अन्य बाबींचे असे एकूण १२.५ कोटी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. यातील राज्य सरकारच्या वाट्याची ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. मात्र मनपाकडून अद्याप थकीत रक्कम न मिळाल्याने संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
याबाबत गेल्या ६ ते ७ वर्षांपासून सेवानिवृत्त शिक्षक व तालुका पेन्शन संघटना प्रयत्न करीत आहेत. मात्र मनपामधील अधिकारी व आयुक्त यांना निवेदन देऊनदेखील रक्कम मिळालेली नाही.
याप्रश्नी शिष्टमंडळाने राज्यमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात कुरेशी गुलाम हैदर, सलाउद्दीन यासीम, अल्ताफ अहमद, जगन्नाथ जयराम आदी उपस्थित होते. चर्चेत मनपाला थकीत रक्कम देण्यासंबंधी दहा दिवसांचा आत बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले, अशी माहिती अध्यक्ष बी. के. नागपुरे यांनी दिली.