हिंसाचार प्रकरणी अधीक्षक खांडवी यांचा इशारा
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरात त्रिपुरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईबाबतदेखील आजी-माजी आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस घटनेचा निष्पक्षपणे तपास करीत आहेत. जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ५२ आरोपींना अटक करण्यात आल्याचे खांडवी यांनी सांगितले.
मालेगाव बंदला हिंसक वळण लागून दगडफेकीची घटना घडली होती. या नंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी संशयितांचे अटकसत्र सुरू केल्याने याविषयी माजी आमदार आसिफ शेख व विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांनी नाराजीचा सूर आळवीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली. दरम्यान अपर पोलिस अधीक्षक खांडवी यांनी बुधवारी (दि. १७) कुल जमाती तन्जिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कारवाईबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई फिर्यादी आरोपी एवढ्याच दृष्टीकोनातून सुरू आहे. पोलिस तपासात मिळत असलेले पुरावे ग्राह्य धरून कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुस्लिम संघटना व पदाधिकारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
अकादमीच्या कार्यालयाची झडती
मालेगाव हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत ५२ आरोपींना अटक करण्यात आली. बंद आयोजक रजा अकादमीच्या कार्यालयाचीदेखील झडती घेण्यात आली असून, येथून काही कागदपत्रे, पत्रक जप्त करण्यात आली. हिंसाचार घटनेशी काही संबध आहे का हे तपासून पहिले जात असल्याचे खांडवी यांनी स्पष्ट केले. हिंसाचार प्रकरणातील २२ आरोपींची पोलिस कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना न्यायालात हजर करण्यात आले होते. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरात त्रिपुरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईबाबतदेखील आजी-माजी आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस घटनेचा निष्पक्षपणे तपास करीत आहेत. जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ५२ आरोपींना अटक करण्यात आल्याचे खांडवी यांनी सांगितले.
मालेगाव बंदला हिंसक वळण लागून दगडफेकीची घटना घडली होती. या नंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी संशयितांचे अटकसत्र सुरू केल्याने याविषयी माजी आमदार आसिफ शेख व विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांनी नाराजीचा सूर आळवीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली. दरम्यान अपर पोलिस अधीक्षक खांडवी यांनी बुधवारी (दि. १७) कुल जमाती तन्जिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कारवाईबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई फिर्यादी आरोपी एवढ्याच दृष्टीकोनातून सुरू आहे. पोलिस तपासात मिळत असलेले पुरावे ग्राह्य धरून कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुस्लिम संघटना व पदाधिकारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
अकादमीच्या कार्यालयाची झडती
मालेगाव हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत ५२ आरोपींना अटक करण्यात आली. बंद आयोजक रजा अकादमीच्या कार्यालयाचीदेखील झडती घेण्यात आली असून, येथून काही कागदपत्रे, पत्रक जप्त करण्यात आली. हिंसाचार घटनेशी काही संबध आहे का हे तपासून पहिले जात असल्याचे खांडवी यांनी स्पष्ट केले. हिंसाचार प्रकरणातील २२ आरोपींची पोलिस कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना न्यायालात हजर करण्यात आले होते. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.