अ‍ॅपशहर

अन् त्याच्यात घडला सकारात्मक बदल

लहानपणापासूनच हुशारी हा अंगभूत गुण असल्याने प्रवेश घेतलेल्या क्षेत्रातही त्याचे चमकदार शैक्षणिक कामगिरी केली. पण एका टप्प्यावर आपण मनाविरोधात जगत असल्याच्या भावनेने त्याच्या मनात घर केलं अन् उमेदीच्या कालावधीतच त्याने कामच न करण्याचा निश्चय केला.

जितेंद्र तरटे | Maharashtra Times 18 Oct 2017, 3:38 am
jitendra.tarte@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mana sajjana
अन् त्याच्यात घडला सकारात्मक बदल

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : आर्मीत जाऊन स्वत:चं आकाश निर्माण करण्यायचं स्वप्न त्याने लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर त्याने केवळ पालकांच्या अपेक्षापूर्तीसाठी स्वत:च्या मनाविरोधातलं क्षेत्र निवडलं. लहानपणापासूनच हुशारी हा अंगभूत गुण असल्याने प्रवेश घेतलेल्या क्षेत्रातही त्याचे चमकदार शैक्षणिक कामगिरी केली. पण एका टप्प्यावर आपण मनाविरोधात जगत असल्याच्या भावनेने त्याच्या मनात घर केलं अन् उमेदीच्या कालावधीतच त्याने कामच न करण्याचा निश्चय केला.

प्रत्येक शहरागणिक अनेक तरुणांमध्ये आढळणारी ही प्रातिनिधिक कहाणी आहे नाशिकमधली. पण त्याच्या या निर्णयाने स्वप्नाळू आई वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. सुरुवातीला स्वत: आणि नंतर अनेक आप्तेष्ट, हितचिंतक अन् मुलाच्या मित्रांकरवी त्याची समजूत काढण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण मनाविरोधातील करिअरच्या क्षेत्रात लोटला गेल्याने त्याचा पालकांवरील राग कायम होता. आयुष्यातले उमेदीचे क्षण या समजवणुकीतच वाया जात असल्याने त्याचे हितचिंतकही तणावात येत होते. पण त्याच्या हट्टापुढे सर्वांनीच हात टेकले असताना एका आप्तेष्टांच्या सल्ल्याने पालकांनी अखेरचा प्रयत्न करण्याचे मनावर घेतले.

यानुसार समुपदेशकांची मदत घेण्याचा घरात एकमताने निर्णय झाला. समुपदेशकांनी अगोदर श्रोत्याची भूमिका देत त्या तरुणाला मनाजोगते व्यक्त होऊ दिले. अखेरीला भूतकाळ आठवून स्वत:ला किती दिवस असा कोसत बसणार अन् वर्तमानासह भविष्यही धोक्यात घालणार? या भावनेस हात घालणाऱ्या प्रयत्नाला त्याने हळूहळू प्रतिसाद दिला अन् एका क्षणाला हाती असलेले करिअर आनंदाने स्वीकारून नवं आयुष्य साकारण्याची उमेद त्याच्या मनात जागी झाली. या करिअरमध्ये पुढच्या कालावधीत स्वत:ला झोकून देत त्याने स्वत:चं अस्तित्वही निर्माण केलं आहे.

क्षितिजांना नाही सीमारेषा

नैराश्याच्या गर्तेतून त्याला खेचून बाहेर काढणाऱ्या समुपदेशकांनी या कहाणीतील नावे जाहीर करण्यास मनाई केली. पण अनेक तरुणांचे नैराश्य भूतकाळातून आलेले असते. वर्तमान स्वीकारत त्याच्यावर प्रेम करायला शिका, नकारात्मक भूतकाळ किडलेल्या फोडीसारखा मनातून काढून टाका अन् उद्याच्या सोनेरी पहाटेची स्वप्न बघत नवी उमेद धारण करा.. असा गुरूमंत्र जपल्यास तुमच्या क्षितिजांना सीमारेषा नाहीत, असा संदेश या कहाणीशी संबंधित समुपदेशकांनी ‘मना सज्जना’ या मालिकेसाठी दिला.

.. अशी केली नकारात्मकतेवर मात !

स्पर्धा, ताण-तणाव, धावपळीची जीवनशैली या शब्दांमुळे मेटाकुटीस आलेल्या तरुणाईचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही ‘मना सज्जना’ या मालिकेद्वारे करत आहोत. या विषयावर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. तुमच्याही आयुष्यात कधीतरी करिअर, स्पर्धा, रिलेशनशिप, व्यसनाधिनता, अपयश अशा कुठल्याही मुद्द्याशी निगडीत कसोटीचे क्षण असतीलच ना! मग या कसोटीला तुम्ही तोंड कसं दिलतं? तुमच्या पदरी पडलेल्या नैराश्यावर तुम्ही मात करून पुढे यश कसं मिळवलत? नाही रे, खड्ड्यातून तुम्ही बाहेर कसे पडलात? असे तुमचे अनुभव लिहून पाठवा. तुमच्या योग्य अनुभवांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्धी देण्यात येईल. अनुभवाच्या मांडणीत तुमची नावे आणि वैयक्तिक ओळख गुप्त ठेवण्यात येईल. तर, ‘पत्र नव्हे मित्र’ हे ब्रीद जपणाऱ्या ‘मटा’च्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या ई-मेल पत्त्यावर मेल करा : पत्ता असा : mataamanasajjana@gmail.com
लेखकाबद्दल
जितेंद्र तरटे
जितेंद्र तरटे हे महाराष्ट्र टाइम्स, नाशिक आवृत्तीत ११ वर्षांपासून कार्यरत आहेत.पत्रकारितेत त्यांचा १६ वर्षांचा अनुभव आहे. धर्म-अध्यात्म, कृषी-पर्यटन, प्रशासन-पंचायत राज व्यवस्था, पुरातत्त्व-संस्कृती या विषयावर ते लेखन करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज