म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड रेल्वे स्टेशनवर इंधन भरलेल्या मालगाडीच्या एका डब्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात प्रवाशांची घबराट उडाली. शेजारील निवासी वसाहती जळून खाक होण्याचा धोका असताना रेल्वे कर्मचारी अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
मालगाडीच्या डब्याला लागलेली आग लवकर विझली नसती तर इंधनाचे सर्व डबे पेटून मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म चारवर धर्माबाद एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म पाचवर भुसावळ-मुंबई पॅसेंजर इतर प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. आग विझल्याने प्रवासी वाचले. संबंधित मालगाडी प्लॅटफॉर्म चार आणि पाचच्या मधोमध उभी होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून पेट्रोल घेऊन मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या एका टँकरला मनमाड रेल्वे स्टेशनवर आग लागली. मालगाडीच्या सर्व ५० टँकर्समध्ये पेट्रोल होते. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली नसती तर रेल्वे स्टेशनसोबत परिसरातील वसाहती जळून बेचिराख होण्याची भीती होती. घाबरलेल्या प्रवाशांची पळापळ झाली. रेल्वे स्टेशनला खेटून असलेल्या वसाहतीमध्ये घबराट पसरली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरवर पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुदैवाने संभाव्य अनर्थ टळला.
मनमाड रेल्वे स्टेशनवर इंधन भरलेल्या मालगाडीच्या एका डब्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात प्रवाशांची घबराट उडाली. शेजारील निवासी वसाहती जळून खाक होण्याचा धोका असताना रेल्वे कर्मचारी अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
मालगाडीच्या डब्याला लागलेली आग लवकर विझली नसती तर इंधनाचे सर्व डबे पेटून मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म चारवर धर्माबाद एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म पाचवर भुसावळ-मुंबई पॅसेंजर इतर प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. आग विझल्याने प्रवासी वाचले. संबंधित मालगाडी प्लॅटफॉर्म चार आणि पाचच्या मधोमध उभी होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून पेट्रोल घेऊन मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या एका टँकरला मनमाड रेल्वे स्टेशनवर आग लागली. मालगाडीच्या सर्व ५० टँकर्समध्ये पेट्रोल होते. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली नसती तर रेल्वे स्टेशनसोबत परिसरातील वसाहती जळून बेचिराख होण्याची भीती होती. घाबरलेल्या प्रवाशांची पळापळ झाली. रेल्वे स्टेशनला खेटून असलेल्या वसाहतीमध्ये घबराट पसरली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरवर पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुदैवाने संभाव्य अनर्थ टळला.