बँका, सहकारी व धर्मदायी संस्था, कंपन्या आदींना मार्च एण्ड अखेरपर्यंतचे टार्गेट या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच दिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करुन वर्षभर प्रयत्न केले जातात. संस्था आणि कर्मचारी स्पर्धेत टिकावेत या उद्देशाने टार्गेट दिली जातात.
महाबँकेचे यश बँक ऑफ महाराष्ट्रच्या नाशिक जिल्ह्यात ९० शाखा असून सर्वांना मिळून साडेआठ हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट दिले होते. ३० मार्च अखेर ८३०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रताप मोहन्ती यांनी दिली. यामध्ये पाच हजार कोटींच्या ठेवी आणि ३३०० कोटींचे टार्गेट साध्य झाले आहे. मुद्रा योजनेंतर्गत अडीच हजार व्यक्तींना उद्योग व्यवसायासाठी ३० कोटीचा निधी वितरित करण्यात आला. सव्वा लाख लोकांना पंतप्रधान सुरक्षा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्टे मोठे होते. परंतु, जनतेचा प्रतिसाद कमी लाभल्याने दीड हजार लाभार्थ्यांनीच लाभ घेतला. पंतप्रधान जनधन योजनेत तब्बल पाच लाख लोकांनी खाते उघडली.
एलआयसीची अव्वल विश्वासाहर्तेमुळे विमा क्षेत्रात नंबर वन असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मार्चअखेर आघाडी घेतली. विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणाय यांनी सांगितले, की या वर्षात ९२०० मृत्युदावे आले. त्यासाठी ११७ कोटींची रक्कम विमाधारकांना अदा करण्यात आली. याबाबत नाशिक विभाग देशातील ११२ विभागांमध्ये नंबर वन आला आहे. एलआयसीच्या गडकरी चौकातील नाशिक विभागातंर्गत नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, दोंडाईचा आदी ठिकाणी मिळून २० शाखा आहेत. या आर्थिक वर्षात दोन लाख ३० हजार पॉलिसीजचे उद्दिष्टे होते. त्यापैकी दोन लाख पॉलिसीज झाल्या. प्रिमीयमचे २२५ कोटींचे टार्गेट होते. त्यापैकी दोनशे कोटी प्रिमीयम जमा झाला.
महाबँकेचे यश बँक ऑफ महाराष्ट्रच्या नाशिक जिल्ह्यात ९० शाखा असून सर्वांना मिळून साडेआठ हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट दिले होते. ३० मार्च अखेर ८३०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रताप मोहन्ती यांनी दिली. यामध्ये पाच हजार कोटींच्या ठेवी आणि ३३०० कोटींचे टार्गेट साध्य झाले आहे. मुद्रा योजनेंतर्गत अडीच हजार व्यक्तींना उद्योग व्यवसायासाठी ३० कोटीचा निधी वितरित करण्यात आला. सव्वा लाख लोकांना पंतप्रधान सुरक्षा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्टे मोठे होते. परंतु, जनतेचा प्रतिसाद कमी लाभल्याने दीड हजार लाभार्थ्यांनीच लाभ घेतला. पंतप्रधान जनधन योजनेत तब्बल पाच लाख लोकांनी खाते उघडली.
एलआयसीची अव्वल विश्वासाहर्तेमुळे विमा क्षेत्रात नंबर वन असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मार्चअखेर आघाडी घेतली. विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणाय यांनी सांगितले, की या वर्षात ९२०० मृत्युदावे आले. त्यासाठी ११७ कोटींची रक्कम विमाधारकांना अदा करण्यात आली. याबाबत नाशिक विभाग देशातील ११२ विभागांमध्ये नंबर वन आला आहे. एलआयसीच्या गडकरी चौकातील नाशिक विभागातंर्गत नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, दोंडाईचा आदी ठिकाणी मिळून २० शाखा आहेत. या आर्थिक वर्षात दोन लाख ३० हजार पॉलिसीजचे उद्दिष्टे होते. त्यापैकी दोन लाख पॉलिसीज झाल्या. प्रिमीयमचे २२५ कोटींचे टार्गेट होते. त्यापैकी दोनशे कोटी प्रिमीयम जमा झाला.