लोगो- मटा मालिका
उद्यानांचे तीनतेरा
भाग २
--
दुरुस्तीला लाभेना मुहूर्त
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
तुटलेल्या खेळणी, वाढलेले गवत, अस्वच्छता अशी दयनीय अवस्था आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील आडगाव परिसरातील उद्यानांची. या परिसरातील उद्यानांची दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नसल्याची स्थिती आहे.
आडगावमधील अडीच एकरमध्ये उभारण्यात आलेले महालक्ष्मी उद्यान, तसेच कोणार्कनगर, स्वामी समर्थनगर, सागर व्हिलेज कॉलनी, श्रीरामनगर, सरस्वतीनगर आदी ठिकाणच्या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे.
आडगाव परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्याने येथील उद्यानांत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले अाहे. त्यामुळे परिसरातील नागरिकदेखील उद्यानांत येणे टाळत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
दिवाळीच्या सुटीमुळे बच्चेकंपनीचा ओढा उद्यानांकडे वाढला आहे. पण, परिसरातील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याने त्यांची निराशा होत आहे. ज्येष्ठ नागरिक, सुटीनिमित्त आलेले पाहुणे आदींनादेखील गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
--
पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा अभाव
आडगाव परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. शिवाय उद्यानाच्या देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारीही नसल्याने उद्यानांतील गवतच काढले जात नाही. परिसरातील उद्यानांतील खेळणीही पूर्णपणे मोडलेल्या असून, लॉन्सचीदेखील वाट लागली आहे. उद्यानांतील कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही उद्यानांत तर मद्याच्या बाटल्यादेखील दिसून येत आहेत.
--
खेळणी, पथदीपांची दुरवस्था
बहुतांश उद्यानांना अजून संरक्षक भिंतच बांधलेली नाही, तर काही ठिकाणचे संरक्षक कथडे कोसळलेले आहेत. काही ठिकाणी संरक्षक जाळ्यांची मोडतोड झालेली आहे. उद्यानातील पथदीपांचीही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर उद्यान परिसरात टवाळखोरांचा वावर वाढल्याचे दिसून येते. काही उद्यानांतील ग्रीन जिमच्या साहित्याचीही मोडतोड झालेली आहे. त्याचीदेखील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
--
मैदानांची आवश्यकता
आडगाव परिसरात अनेक नवीन वसाहती विकसित होत आहेत. पण, परिसरात उद्यानांची दयनीय अवस्था आहे. शिवाय मुलांना खेळण्यासाठी मैदानेदेखील नाहीत. त्यामुळे उद्यान विभागाच्या वतीने सर्व उद्यानांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करून पुनर्वैभव मिळवून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
--
आडगाव परिसरातील बहुतांश उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानांतील गवत काढले जात नाही, स्वच्छता केली जात नसल्यामुळे डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. महापालिकेने परिसरातील उद्यानांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-अजित पाटील, स्थानिक रहिवासी
उद्यानांचे तीनतेरा
भाग २
--
दुरुस्तीला लाभेना मुहूर्त
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
तुटलेल्या खेळणी, वाढलेले गवत, अस्वच्छता अशी दयनीय अवस्था आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील आडगाव परिसरातील उद्यानांची. या परिसरातील उद्यानांची दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नसल्याची स्थिती आहे.
आडगावमधील अडीच एकरमध्ये उभारण्यात आलेले महालक्ष्मी उद्यान, तसेच कोणार्कनगर, स्वामी समर्थनगर, सागर व्हिलेज कॉलनी, श्रीरामनगर, सरस्वतीनगर आदी ठिकाणच्या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे.
आडगाव परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्याने येथील उद्यानांत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले अाहे. त्यामुळे परिसरातील नागरिकदेखील उद्यानांत येणे टाळत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
दिवाळीच्या सुटीमुळे बच्चेकंपनीचा ओढा उद्यानांकडे वाढला आहे. पण, परिसरातील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याने त्यांची निराशा होत आहे. ज्येष्ठ नागरिक, सुटीनिमित्त आलेले पाहुणे आदींनादेखील गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
--
पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा अभाव
आडगाव परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. शिवाय उद्यानाच्या देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारीही नसल्याने उद्यानांतील गवतच काढले जात नाही. परिसरातील उद्यानांतील खेळणीही पूर्णपणे मोडलेल्या असून, लॉन्सचीदेखील वाट लागली आहे. उद्यानांतील कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही उद्यानांत तर मद्याच्या बाटल्यादेखील दिसून येत आहेत.
--
खेळणी, पथदीपांची दुरवस्था
बहुतांश उद्यानांना अजून संरक्षक भिंतच बांधलेली नाही, तर काही ठिकाणचे संरक्षक कथडे कोसळलेले आहेत. काही ठिकाणी संरक्षक जाळ्यांची मोडतोड झालेली आहे. उद्यानातील पथदीपांचीही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर उद्यान परिसरात टवाळखोरांचा वावर वाढल्याचे दिसून येते. काही उद्यानांतील ग्रीन जिमच्या साहित्याचीही मोडतोड झालेली आहे. त्याचीदेखील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
--
मैदानांची आवश्यकता
आडगाव परिसरात अनेक नवीन वसाहती विकसित होत आहेत. पण, परिसरात उद्यानांची दयनीय अवस्था आहे. शिवाय मुलांना खेळण्यासाठी मैदानेदेखील नाहीत. त्यामुळे उद्यान विभागाच्या वतीने सर्व उद्यानांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करून पुनर्वैभव मिळवून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
--
आडगाव परिसरातील बहुतांश उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानांतील गवत काढले जात नाही, स्वच्छता केली जात नसल्यामुळे डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. महापालिकेने परिसरातील उद्यानांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-अजित पाटील, स्थानिक रहिवासी