कोणीही यावे अन् नाशिककरांना टपली मारून जावे, हे कधी थांबणार आहे? नद्यांचे उगमस्थान असूनही नाशिकचा पाण्याचा वाटा इतर भागासाठी अक्षरश: ओरबाडून घेतला जातो. नाशिक तहानलेले असताना मराठवाड्यातील मद्य कंपन्यांना पाणीपुरवठ्याची काळजी घेतली जाते. आता भावली धरणाचे पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेऊन शासनाने नाशिककरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. एकीकडे पाणी असे पळविले जात असताना इंडस्ट्रियल कॉरिडोरमधून नाशिकला वगळण्याचा निर्णय घेताना पाण्याची उपलब्धता नसल्याचे कारण दिले जाते. हे निर्णय नाशिकच्या नेत्यांना समजूही नये यातच त्यांच्या दक्षतेची पावती मिळते. हा अन्याय थांबविण्यासाठी आता नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागेल.
मटा भूमिका - पाणी पळविले
कोणीही यावे अन् नाशिककरांना टपली मारून जावे, हे कधी थांबणार आहे? नद्यांचे उगमस्थान असूनही नाशिकचा पाण्याचा वाटा इतर भागासाठी अक्षरश: ओरबाडून घेतला ...
Maharashtra Times 24 May 2018, 4:00 am