म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नालेसफाईच्या चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या नाशिककरांना पावसाळी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नालेसफाईच्या चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी पावसाळी भुयारी गटार योजनेची चौकशी सीबीआयमार्फत करू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारीही गोंधळात पडले आहेत.
पावसाळी गटार योजनेतील कामांना राज्य सरकारनेच यापूर्वी क्लीन चिट दिली आहे. त्यातच सध्या महापालिकेत नालेसफाईचा मुद्दा गाजत आहे. नालेसफाईच्या चौकशीची मागणी नागरिकांसह विरोधकांनी अनेक वेळा केली. परंतु, या मागणीकडे महापौरांनी वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्यातच आज पंचवटीत महापौरांनी एका कार्यक्रमात बोलताना पावसाळी गटार योजनेची सीबीआयमार्फत चौकशी करू, अशी घोषणा केली. त्यामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाले. सध्या नालेसफाईच्या चौकशीची मागणी होत असताना महापौरांनी भुयारी गटारीच्या चौकशीची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे महापौरांच्या या अफलातून घोषणेची चर्चा सुरू आहे. सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव द्यावा लागतो. परंतु, या प्रक्रियेची माहिती न घेताच त्यांनी परस्पर घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नालेसफाईच्या चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या नाशिककरांना पावसाळी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नालेसफाईच्या चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी पावसाळी भुयारी गटार योजनेची चौकशी सीबीआयमार्फत करू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारीही गोंधळात पडले आहेत.
पावसाळी गटार योजनेतील कामांना राज्य सरकारनेच यापूर्वी क्लीन चिट दिली आहे. त्यातच सध्या महापालिकेत नालेसफाईचा मुद्दा गाजत आहे. नालेसफाईच्या चौकशीची मागणी नागरिकांसह विरोधकांनी अनेक वेळा केली. परंतु, या मागणीकडे महापौरांनी वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्यातच आज पंचवटीत महापौरांनी एका कार्यक्रमात बोलताना पावसाळी गटार योजनेची सीबीआयमार्फत चौकशी करू, अशी घोषणा केली. त्यामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाले. सध्या नालेसफाईच्या चौकशीची मागणी होत असताना महापौरांनी भुयारी गटारीच्या चौकशीची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे महापौरांच्या या अफलातून घोषणेची चर्चा सुरू आहे. सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव द्यावा लागतो. परंतु, या प्रक्रियेची माहिती न घेताच त्यांनी परस्पर घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.