म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील महापालिकेच्या सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक महासभेने एकमताने मंजूर केल्यानंतर मदरसा, इदगाह व मुस्लमि कब्रस्थानच्या नावाखाली पालिकेतील महागठबंधन आघाडीच्या नेत्यांनी शासनाची दिशाभूल करून अंदाजपत्रकास स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत. स्वतः सत्तेवर असताना काहीही विकासकामे करू न शकल्याने आता आम्ही करीत असलेल्या विकासकामना रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न केवीलवाणा आहे, असा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला.
येथील उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकास स्थगिती मिळाल्यापासून सत्ताधारी काँग्रेस व विरोधी महागठबंधन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विरोधकांच्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. शेख म्हणाले, विरोधकांनी मशिदीच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. मात्र त्यांचा हा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. महागठबंधनकडून जाहीर करण्यात आलेल्या ६५ मशिदीच्या यादीत १५ ते १६ मशीद अशा आहेत, जेथे कोणत्याही कामांची आवश्यकता नाही. या यादीतील अनेक मशदिी या विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील असून, इतके वर्ष त्यासाठी काहीच का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अंदाजपत्रक स्थगितीवर त्यांनी चर्चा केली. पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयास अहवाल पाठवला असून, अंदाजपत्रकात आपण प्रत्येक नगरसेवकास कायद्यानुसार योग्य निधी दिला आहे. शासन अंदाजपत्रकावरील स्थगिती हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेस काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.
विकासकामे झालीच नाहीत...
शेख यांनी माजी महापौर हाजी मोह. इब्राहीम व राष्ट्रवादीचे मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकाळात शहरात ६ ठिकाणी घाईघाईने दोन कोटीहून अधिक सहा विकास कामांचे उद्घाटन झालेत असे सांगितले. प्रत्यक्षात उद्घाटनाला आठ महिने उलटूनही कामांना सुरुवात झाली नाही. ही विकासकामेच न करता त्याची बिले काढण्याचा यांचा बेत होता का? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.
येथील महापालिकेच्या सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक महासभेने एकमताने मंजूर केल्यानंतर मदरसा, इदगाह व मुस्लमि कब्रस्थानच्या नावाखाली पालिकेतील महागठबंधन आघाडीच्या नेत्यांनी शासनाची दिशाभूल करून अंदाजपत्रकास स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत. स्वतः सत्तेवर असताना काहीही विकासकामे करू न शकल्याने आता आम्ही करीत असलेल्या विकासकामना रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न केवीलवाणा आहे, असा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला.
येथील उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकास स्थगिती मिळाल्यापासून सत्ताधारी काँग्रेस व विरोधी महागठबंधन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विरोधकांच्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. शेख म्हणाले, विरोधकांनी मशिदीच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. मात्र त्यांचा हा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. महागठबंधनकडून जाहीर करण्यात आलेल्या ६५ मशिदीच्या यादीत १५ ते १६ मशीद अशा आहेत, जेथे कोणत्याही कामांची आवश्यकता नाही. या यादीतील अनेक मशदिी या विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील असून, इतके वर्ष त्यासाठी काहीच का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अंदाजपत्रक स्थगितीवर त्यांनी चर्चा केली. पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयास अहवाल पाठवला असून, अंदाजपत्रकात आपण प्रत्येक नगरसेवकास कायद्यानुसार योग्य निधी दिला आहे. शासन अंदाजपत्रकावरील स्थगिती हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेस काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.
विकासकामे झालीच नाहीत...
शेख यांनी माजी महापौर हाजी मोह. इब्राहीम व राष्ट्रवादीचे मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकाळात शहरात ६ ठिकाणी घाईघाईने दोन कोटीहून अधिक सहा विकास कामांचे उद्घाटन झालेत असे सांगितले. प्रत्यक्षात उद्घाटनाला आठ महिने उलटूनही कामांना सुरुवात झाली नाही. ही विकासकामेच न करता त्याची बिले काढण्याचा यांचा बेत होता का? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.