Jitendra.tarte@timesgroup.com
@jitendratarteMT
नाशिक : कुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीजमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याच्या मुद्द्यास अलिकडील काही तज्ज्ञांचे पाहणी अहवाल साक्षी आहेत. यामुळे मेडिकल टुरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या व्हीजन्ससाठी येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
बहुतांशी प्रशासकीय कामकाजात अडकलेल्या आरोग्य विद्यापीठाने काही उपक्रम घेऊन जनमानसांत पावले रोवण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात आदर्श आरोग्य चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होतो आहे. सद्यःस्थितीतील लोकसंख्येच्या आरोग्य गरजा आणि उपलब्ध सेवा यांचे गुणोत्तरही व्यस्तच असल्याचे निष्कर्ष हाती आहेत. ही दरी मिटविण्यासाठी आरोग्य विद्यापीठासारख्या सक्षम संस्थांच्या मध्यस्थीची गरज व्यक्त होत आहे.
मेट्रो शहरांकडूनही पसंती
बाह्य देशांसोबतच देशातील मेट्रो शहरांमधूनही आरोग्य सुविधांच्या उपयोगासाठी नाशिकला प्राधान्य देणारा आलेखही वाढीला लागल्याचे एक पाहणी सांगते. यात मुंबईकडून नाशिकमध्ये विविध शस्त्रक्रियांसाठी येणारे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. कारण, मेट्रो शहरांच्या तुलनेत अद्याप येथील वैद्यकीय सुविधांचे दर तुलनेने कमी आहेत. या उदाहरणांमधील क्षमता लक्षात घेता शहरास मेडिकल टुरिझम प्लेस बनविण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने उचल घेतल्यास हे ही अशक्य नाही असा आशावाद आहे.
लोकभाषेतून व्हावे जनप्रबोधन
‘महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ’ हे नामाभिधान मराठीतून आहे. तसेच विद्यापीठाकडून आरोग्यदृष्ट्या जनप्रबोधनाचे कामकाजही मराठीतून चालावे, असा एक प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांच्या कारकीर्दीत ‘थिंक टँक’समोर मांडला गेला होता. मात्र, हा प्रस्ताव पुढे बासनात गुंडाळला गेला. स्थानिक जनतेच्या आरोग्यमानाचा आलेख, त्यांचे आरोग्याविषयीचे सामान्य प्रश्न, विविध आजार, उपचार पध्दती, उपचार केंद्र यांबाबतच तपशील, संपर्क क्रमांक, विविध आरोग्य योजना, व्याख्याने, चर्चासत्र, शोधनिबंध, नवसंशोधन आदी आरोग्य साहित्य हे मराठीतून निर्माण व्हावे आणि वेबसाइटसारख्या लोकमाध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचावे असा तो प्रस्ताव होता. विद्यमान व्यवस्थापनाने यासारखे प्रस्ताव पुनरूज्जीवीत करावे अशीही अपेक्षा नाशिककरांकडून विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदानानिमित्ताने व्यक्त झाली.
(समाप्त)
@jitendratarteMT
नाशिक : कुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीजमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याच्या मुद्द्यास अलिकडील काही तज्ज्ञांचे पाहणी अहवाल साक्षी आहेत. यामुळे मेडिकल टुरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या व्हीजन्ससाठी येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
बहुतांशी प्रशासकीय कामकाजात अडकलेल्या आरोग्य विद्यापीठाने काही उपक्रम घेऊन जनमानसांत पावले रोवण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात आदर्श आरोग्य चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होतो आहे. सद्यःस्थितीतील लोकसंख्येच्या आरोग्य गरजा आणि उपलब्ध सेवा यांचे गुणोत्तरही व्यस्तच असल्याचे निष्कर्ष हाती आहेत. ही दरी मिटविण्यासाठी आरोग्य विद्यापीठासारख्या सक्षम संस्थांच्या मध्यस्थीची गरज व्यक्त होत आहे.
मेट्रो शहरांकडूनही पसंती
बाह्य देशांसोबतच देशातील मेट्रो शहरांमधूनही आरोग्य सुविधांच्या उपयोगासाठी नाशिकला प्राधान्य देणारा आलेखही वाढीला लागल्याचे एक पाहणी सांगते. यात मुंबईकडून नाशिकमध्ये विविध शस्त्रक्रियांसाठी येणारे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. कारण, मेट्रो शहरांच्या तुलनेत अद्याप येथील वैद्यकीय सुविधांचे दर तुलनेने कमी आहेत. या उदाहरणांमधील क्षमता लक्षात घेता शहरास मेडिकल टुरिझम प्लेस बनविण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने उचल घेतल्यास हे ही अशक्य नाही असा आशावाद आहे.
लोकभाषेतून व्हावे जनप्रबोधन
‘महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ’ हे नामाभिधान मराठीतून आहे. तसेच विद्यापीठाकडून आरोग्यदृष्ट्या जनप्रबोधनाचे कामकाजही मराठीतून चालावे, असा एक प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांच्या कारकीर्दीत ‘थिंक टँक’समोर मांडला गेला होता. मात्र, हा प्रस्ताव पुढे बासनात गुंडाळला गेला. स्थानिक जनतेच्या आरोग्यमानाचा आलेख, त्यांचे आरोग्याविषयीचे सामान्य प्रश्न, विविध आजार, उपचार पध्दती, उपचार केंद्र यांबाबतच तपशील, संपर्क क्रमांक, विविध आरोग्य योजना, व्याख्याने, चर्चासत्र, शोधनिबंध, नवसंशोधन आदी आरोग्य साहित्य हे मराठीतून निर्माण व्हावे आणि वेबसाइटसारख्या लोकमाध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचावे असा तो प्रस्ताव होता. विद्यमान व्यवस्थापनाने यासारखे प्रस्ताव पुनरूज्जीवीत करावे अशीही अपेक्षा नाशिककरांकडून विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदानानिमित्ताने व्यक्त झाली.
(समाप्त)