अ‍ॅपशहर

कैद्यांना विपश्यनेचा आधार!

कारागृहांमध्ये कायमस्वरुपी केंद्रे सुरू होणार

Maharashtra Times 26 Jun 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड राज्यातील कारागृहांमधील कैद्यांसाठी कायमस्वरुपी विपश्यना केंद्रे सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून बंदिवानांचे मन परिवर्तन आणि जीवनात बदल घडतील, असा आशावाद राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी व्यक्त केला. कारागृहामध्ये कायमस्वरुपी विपश्यना केंद्राची जागा निश्चित करण्यासाठी मीना यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, कारागृह अधिक्षक रमेश कांबळे, कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, विपश्यणा आचार्य दिलीप देशपांडे, समन्वयक श्रीरंग सारडा आदी उपस्थित होते. मीना म्हणाले, की नकारात्मक विचारांमुळे मानसाच्या मनात इर्षा, द्वेषसारख्या भावना तयार होतात. त्यातून एखाद्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो. रागात माणसाच्या हातून गुन्हा घडतो. बंदिजनांच्या मनातून नकारात्मक विचारांना दूर करण्याचे काम विपशनेद्वारे होऊ शकते. या साधनेतून परिवर्तन घडवण्यासाठी कारागृहात विपश्यना केंद्र सुरू केले जाणार आहे. मीना यांनी कारागृह परिसरामध्ये विपश्यना केंद्रासाठी जागेची पाहणी करुन तेथे आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. हे केंद्र सुरू झाल्यानंतर येथे १० दिवसांची निवासी शिबीरे होतील. पुरुष व महिला बंदिवानाना स्वेच्छेने या शिबीरामध्ये सहभागी होता येईल. अधिकारी, कर्मचारी व बंदिजनांनी ‘आना पान’ विपश्यना क्रियेची आचार्यांच्या मार्गदर्शनामध्ये साधना केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज