म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भूमिहीनांच्या ताब्यात असणाऱ्या महसूल व वन विभागाच्या अतिक्रमित जमिनी नियमानुकूल होण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय व्हावा, यासह विविध मागण्यांसाठी मानवी हक्क सुरक्षा दल तथा भारतीय दलित आदिवासी पँथर सेनेच्या वतीने चार दिवसांपासून शहरात आंदोलन छेडण्यात आले आहे. अगोदर हुतात्मा अनंत कान्हेरे परिसरात सुरू केलेल्या आंदोलनास प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांनी मंगळवारी (दि. १७) दुपारी आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या मांडला होता. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने समजूत घातल्यानंतरही आंदोलक रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले.