नाशिक: विधवापण कोणाच्याच नशिबी नको, अशीच प्रत्येक स्त्रीची भावना असते. मात्र, विधवापण आलं की स्त्रीला अधिक यातना होतात. कुंकू लावायचे नाही, जोडवे घालायचे नाही बांगड्या ही घालायच्या नाहीत. महाराष्ट्र कितीही पुरोगामी असला तरी अनेक कुटुंबात ही परंपरा कायम आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने अशा प्रकारांना बंदी घालून परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने त्याला साथ दिली त्यालाच अनुसरून नाशिकमधील सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल १३ वर्षांनी पायात जोडवे घातले आणि कपाळावर लाल टिकली लावलीये. हेही वाचा -विधवा प्रथा मुक्तीचा 'हेरवाड पॅटर्न' राज्यभर राबवा; ठाकरे सरकारचे ग्रामपंचायतींना आवाहन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जात पंचायत विरोधी चळवळ उभारणारे नाशिकच्या इंदिरानगर येथील राहणारे कृष्णा चांदगुडे यांच्या ७६ वर्षे आईने परंपरेची ही चौकट तोडली आहे. चांदवडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील त्र्यंबकराव चांदगुडे हे शेतकरी होते. १३ वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. त्यानंतर सुगंधाबाई जोडवे घातले नाही, की टिकली लावली नाही. अर्थात मुलगा पुरोगामी चळवळीतील असल्याने श्राद्धकर्म करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत विधवा महिलांचा एक ठराव संमत केल्यानंतर महिलेच्या पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे, जोडवे आणि अलंकार काढून घेणे यासारख्या प्राप्त बंदीचा ठराव केला आहे. त्यालाच अनुसरून राज्य शासनाने एक परिपत्रक बुधवारी काढले. तसेच, सर्व ग्रामपंचायतीला असा ठराव करावा, असं म्हटलंय, असं समजताच त्यांनी आपल्याला विधवा आईला हे सगळे सांगितले आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवल्या. सुगंधाबाईंनी देखील त्याचे अनुकरण करत जोडवे घातले. टिकली लावली आणि मंगळसूत्र देखील घातलंय. 'परिवर्तन आपल्या घरातून झालं पाहिजे, मला वाटतं त्यामुळे मी असं पाऊल उचललं', अस कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं.
हेही वाचा -कोल्हापुरातील गावाचा विधवांबाबत क्रांतिकारी निर्णय, हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद
'समाजातील कुप्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहे. आपल्या घरातून त्याची सुरुवात करावी, म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. या कुप्रथांमुळे त्रास होत होता. दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. त्यामुळे आज आनंद होत आहे आणि अशा प्रकारचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि समाजात परिवर्तन आणावं', असं मत सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी व्यक्त केलं.
सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी सुधारणावाद स्विकारला आणि शासन परिपत्रकाचा सन्मान राखत आपल्यात बदल घडवून आणण्याचे ठरविले. यामुळे त्यांची पूर्ण नाशिकसह राज्यात चर्चा होत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जात पंचायत विरोधी चळवळ उभारणारे नाशिकच्या इंदिरानगर येथील राहणारे कृष्णा चांदगुडे यांच्या ७६ वर्षे आईने परंपरेची ही चौकट तोडली आहे. चांदवडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील त्र्यंबकराव चांदगुडे हे शेतकरी होते. १३ वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. त्यानंतर सुगंधाबाई जोडवे घातले नाही, की टिकली लावली नाही. अर्थात मुलगा पुरोगामी चळवळीतील असल्याने श्राद्धकर्म करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत विधवा महिलांचा एक ठराव संमत केल्यानंतर महिलेच्या पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे, जोडवे आणि अलंकार काढून घेणे यासारख्या प्राप्त बंदीचा ठराव केला आहे. त्यालाच अनुसरून राज्य शासनाने एक परिपत्रक बुधवारी काढले. तसेच, सर्व ग्रामपंचायतीला असा ठराव करावा, असं म्हटलंय, असं समजताच त्यांनी आपल्याला विधवा आईला हे सगळे सांगितले आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवल्या. सुगंधाबाईंनी देखील त्याचे अनुकरण करत जोडवे घातले. टिकली लावली आणि मंगळसूत्र देखील घातलंय. 'परिवर्तन आपल्या घरातून झालं पाहिजे, मला वाटतं त्यामुळे मी असं पाऊल उचललं', अस कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं.
हेही वाचा -कोल्हापुरातील गावाचा विधवांबाबत क्रांतिकारी निर्णय, हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद
'समाजातील कुप्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहे. आपल्या घरातून त्याची सुरुवात करावी, म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. या कुप्रथांमुळे त्रास होत होता. दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. त्यामुळे आज आनंद होत आहे आणि अशा प्रकारचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि समाजात परिवर्तन आणावं', असं मत सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी व्यक्त केलं.
सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी सुधारणावाद स्विकारला आणि शासन परिपत्रकाचा सन्मान राखत आपल्यात बदल घडवून आणण्याचे ठरविले. यामुळे त्यांची पूर्ण नाशिकसह राज्यात चर्चा होत आहे.