म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
जणू काही 'त्यांना' आपल्या मृत्यूची चाहूलच लागली होती आणि त्याही अवस्थेत 'त्यांनी' हातातील कुंचल्याची साथ मात्र सोडली नसल्याचे 'त्यांच्या' अखेरच्या हृदयस्पर्शी चित्रातून स्पष्ट झाले. कलाशिक्षक विनायक काकुळते यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अखेरचे ठरलेले चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कलेचे चाहते यांच्या मनाला हे चित्र चटका लावणारे ठरले आहे.
आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले आणि नुकतेच करोना संसर्गामुळे उपचार सुरू असताना निधन झालेले विनायक काकुळते या कलाशिक्षकाने दवाखान्यात गंभीर अवस्थेत असतानादेखील या जगाचा निरोप घेता घेता 'माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब नाही राहिले, तुमचे कुटुंब सांभाळा' असा संदेश देणारे चित्र काढले होते.
सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात विनायक काकुळते कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या कला विषयातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी कला क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेला होता. शाळेच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या फळ्यावर दररोज अर्थपूर्ण चित्र काढण्याची त्यांची आवड त्यांनी सेवेच्या संपूर्ण काळात जोपासली होती. या हरहुन्नरी कलाशिक्षकाचा फलक रेखाटनात हातखंडा होता. सर्वच थोर पुरुषांसह विविध सामाजिक विषयांवरील त्यांनी केलेले प्रबोधनात्मक फलक रेखाटन राज्यभर प्रसिद्ध होते. त्यांच्या अप्रतिम फलक रेखाटनाने कलाप्रेमींचा दिवस सुरू होत असे.
विनायक काकुळते यांच्यावर नाशिक येथे करोना संसर्गावरील उपचार सुरू होते. त्यांच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असतानादेखील या कलाशिक्षकाने आपले व्रत सोडले नाही. साक्षात मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानादेखील विनायक काकुळते यांनी हाती पुन्हा कुंचला घेत अखेरचे चित्र रेखाटून या जगाचा निरोप घेतला. काही वेळ त्यांनी मृत्यूलादेखील थांबवत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब आता नाही राहिले' अशा आशयाचे चित्र काढले.
डबडबलेले डोळे अन् निखळणारी आसवे...
डबडबलेले डोळे आणि त्यातून निखळणारी आसवे अशा अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच्या त्यांच्या या चित्राच्या खाली नायक काकुळते 'तुमचे कुटुंब सांभाळा' असा संदेश द्यायलादेखील विसरले नाहीत. स्वतः या जगाचा निरोप घेत असताना त्यांनी मात्र इतरांच्या कुटुंबाचीदेखील केलेली काळजी सर्वांच्याच मनाला हुरहूर लावणारी ठरली. या कलाशिक्षकाच्या अकाली एक्झिटमुळे नाशिकच्या कला क्षेत्रासह साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
जणू काही 'त्यांना' आपल्या मृत्यूची चाहूलच लागली होती आणि त्याही अवस्थेत 'त्यांनी' हातातील कुंचल्याची साथ मात्र सोडली नसल्याचे 'त्यांच्या' अखेरच्या हृदयस्पर्शी चित्रातून स्पष्ट झाले. कलाशिक्षक विनायक काकुळते यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अखेरचे ठरलेले चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कलेचे चाहते यांच्या मनाला हे चित्र चटका लावणारे ठरले आहे.
आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले आणि नुकतेच करोना संसर्गामुळे उपचार सुरू असताना निधन झालेले विनायक काकुळते या कलाशिक्षकाने दवाखान्यात गंभीर अवस्थेत असतानादेखील या जगाचा निरोप घेता घेता 'माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब नाही राहिले, तुमचे कुटुंब सांभाळा' असा संदेश देणारे चित्र काढले होते.
सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात विनायक काकुळते कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या कला विषयातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी कला क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेला होता. शाळेच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या फळ्यावर दररोज अर्थपूर्ण चित्र काढण्याची त्यांची आवड त्यांनी सेवेच्या संपूर्ण काळात जोपासली होती. या हरहुन्नरी कलाशिक्षकाचा फलक रेखाटनात हातखंडा होता. सर्वच थोर पुरुषांसह विविध सामाजिक विषयांवरील त्यांनी केलेले प्रबोधनात्मक फलक रेखाटन राज्यभर प्रसिद्ध होते. त्यांच्या अप्रतिम फलक रेखाटनाने कलाप्रेमींचा दिवस सुरू होत असे.
विनायक काकुळते यांच्यावर नाशिक येथे करोना संसर्गावरील उपचार सुरू होते. त्यांच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असतानादेखील या कलाशिक्षकाने आपले व्रत सोडले नाही. साक्षात मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानादेखील विनायक काकुळते यांनी हाती पुन्हा कुंचला घेत अखेरचे चित्र रेखाटून या जगाचा निरोप घेतला. काही वेळ त्यांनी मृत्यूलादेखील थांबवत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब आता नाही राहिले' अशा आशयाचे चित्र काढले.
डबडबलेले डोळे अन् निखळणारी आसवे...
डबडबलेले डोळे आणि त्यातून निखळणारी आसवे अशा अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच्या त्यांच्या या चित्राच्या खाली नायक काकुळते 'तुमचे कुटुंब सांभाळा' असा संदेश द्यायलादेखील विसरले नाहीत. स्वतः या जगाचा निरोप घेत असताना त्यांनी मात्र इतरांच्या कुटुंबाचीदेखील केलेली काळजी सर्वांच्याच मनाला हुरहूर लावणारी ठरली. या कलाशिक्षकाच्या अकाली एक्झिटमुळे नाशिकच्या कला क्षेत्रासह साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.