अ‍ॅपशहर

सिटी बससेवा १ मेपासून बंद!

तोटा वाढत असल्याने ना‌िशिक बस वाहतूक सेवा महापालिकेने चालवावी, यासाठी एसटी महामंडळाने वारंवार प्रयत्न केले. मात्र ही सेवा महापालिकेने टाळली. अखेर तोटा भरून निघणे शक्य नसल्याने येत्या १ मेपासून शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

गौतम संचेती | Maharashtra Times 25 Apr 2017, 4:45 pm
नाशिक : महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बससेवा ही महापालिकांनीच सांभाळण्याचे संकेत आहेत. हीच स्थिती राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये आहे. मात्र, ही बाब नाशिकला अपवादात्मक होती. तोटा वाढत असल्याने शहर बस वाहतूक सेवा महापालिकेने चालवावी, यासाठी एसटी महामंडळाने वारंवार प्रयत्न केले. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही सेवा महापालिकेने टाळली. अखेर तोटा भरून निघणे शक्य नसल्याने येत्या १ मेपासून शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik city bus service will stop from 1st may
सिटी बससेवा १ मेपासून बंद!


पाच वर्षांपासून १०८ कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने १ मेपासून शहर बससेवा बंद करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. याबाबत गोपनीयता पाळली जात असली तरी असे पत्र महापालिकेला पुन्हा देण्यात येणार आहे. वाढत्या तोट्यामुळे शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, असे सांगत १ फेब्रुवारी रोजीच ही सेवा बंद करण्याचे एस टी महामंडळाने नाशिक महापालिकेला कळवले होते. पण, महापालिका निवडणुकीनंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ही शहर बससेवा सुरू ठेवण्यात आली. अडीच महिने उलटूनही यावर काहीच निर्णय न झाल्यामुळे आता पुन्हा एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच वर्षांत नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळामार्फत दैनंदिन सरासरी २०८ नियते व एकूण ८९१.३२ कि. मी. (लाख) वाहतूक सेवा पुरविण्यात आली आहे. त्यातून महामंडळाला सुमारे १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे ही बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, अशी मागणी केली होती. पुढे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. याअगोदर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले होते.

पहिल्या टप्प्यात ४५ बसेस बंद

सर्व बसेस एकाच वेळी बंद कराव्या की टप्याटप्याने याबाबत महामंडळ विचार करीत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ४५ बसेस बंद करण्यात येणार आहेत. शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे हा निर्णय दरवर्षी घेतला जात असला तरी या बसेस पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे ज्या मार्गावर सेवा परवडत नसेल तेथेही बस बंद केली जाण्याची शक्यता आहे. या अगोदर अनेक मार्गाच्या फेऱ्या बंद केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज