म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
मध्य रेल्वेकडून प्रत्येक स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, दुर्दैवाने अनेक सधन प्रवास विनातिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत. विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून दंड आकारला जात असून, सर्वांनीच तिकिटे काढून रेल्वेचा प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अरुणकुमार यांनी केले.
देवळाली रेल्वे स्टेशनवर अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकामी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे व रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाने तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी येथील रेल्वे स्टेशनच्या पाहणीवेळी केले.
देवळाली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना कोणत्या व कशा सुविधा प्रदान करता येतील, यासाठी पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी व पत्रकारांशीदेखील संवाद साधत सुविधा पुरविण्याकामी खासदार व आमदार निधीतून रेल्वे स्टेशनच्या आवारात विविध सोयी देण्यासाठी निधी उपलब्धतेविषयी चर्चा करून संबंधित विभागाला पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी, स्टेशन प्रबंधक आर. एस. बागुल, उपप्रबंधक एस. बी. सिन्हा, पीबीएस ए. आर. खंदारे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत देवळालीतील नागरिकांतर्फे रिपाइंचे उपजिल्हाध्यक्ष आर. डी. जाधव, अशोक साळवे, सोनू भालेराव, दीपक उन्हवणे, पंडित साळवे आदींसह नागरिक उपस्थित होते. रेल्वे स्टेशनवर लवकरच उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहितीदेखील यावेळी प्रशासनातर्फे देण्यात आली.
कृषिमालासाठी थांब्याची मागणी
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान या स्टेशनवरून अप व डाउन मार्गांवरून जाणारी एकही गाडी थांबत नसल्याने येथील व्यापाऱ्यांना कृषिमाल पाठविण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गोदान, लखनौ, कामायनी, पवन एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांना थांबा दिल्यास सोयीचे होईल. त्यामुळे नाशिकरोडचा भार कमी होऊन देवळालीतील व्यापाराला चालना मिळेल व रोजगार वाढीस लागून रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
मध्य रेल्वेकडून प्रत्येक स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, दुर्दैवाने अनेक सधन प्रवास विनातिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत. विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून दंड आकारला जात असून, सर्वांनीच तिकिटे काढून रेल्वेचा प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अरुणकुमार यांनी केले.
देवळाली रेल्वे स्टेशनवर अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकामी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे व रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाने तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी येथील रेल्वे स्टेशनच्या पाहणीवेळी केले.
देवळाली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना कोणत्या व कशा सुविधा प्रदान करता येतील, यासाठी पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी व पत्रकारांशीदेखील संवाद साधत सुविधा पुरविण्याकामी खासदार व आमदार निधीतून रेल्वे स्टेशनच्या आवारात विविध सोयी देण्यासाठी निधी उपलब्धतेविषयी चर्चा करून संबंधित विभागाला पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी, स्टेशन प्रबंधक आर. एस. बागुल, उपप्रबंधक एस. बी. सिन्हा, पीबीएस ए. आर. खंदारे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत देवळालीतील नागरिकांतर्फे रिपाइंचे उपजिल्हाध्यक्ष आर. डी. जाधव, अशोक साळवे, सोनू भालेराव, दीपक उन्हवणे, पंडित साळवे आदींसह नागरिक उपस्थित होते. रेल्वे स्टेशनवर लवकरच उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहितीदेखील यावेळी प्रशासनातर्फे देण्यात आली.
कृषिमालासाठी थांब्याची मागणी
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान या स्टेशनवरून अप व डाउन मार्गांवरून जाणारी एकही गाडी थांबत नसल्याने येथील व्यापाऱ्यांना कृषिमाल पाठविण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गोदान, लखनौ, कामायनी, पवन एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांना थांबा दिल्यास सोयीचे होईल. त्यामुळे नाशिकरोडचा भार कमी होऊन देवळालीतील व्यापाराला चालना मिळेल व रोजगार वाढीस लागून रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.