म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे नव्या रस्त्यांसह सिंहस्थातील दर्जेदार रस्त्यांचीही चाळण झाली. गंगापूर रोडसह शहरांतर्गत रस्ते संततधार पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.
दावा केलेले सिंहस्थातील दर्जेदार रस्ते आणि गेल्या वर्षी १९२ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेने या रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु पावसाने त्यावर पाणी फिरविल्याने सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. दरम्यान आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या रस्त्यांच्या कामांचा अहवाल मागवला आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरात कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवास हा रस्त्यानेच गोदावरी नदीपात्राकडे होत आहे. रस्त्यांवरच पाणी साचल्याने या रस्त्यांची खरी गुणवत्ता समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने १९२ कोटी रुपये खर्चून रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांचीही अवस्थाही बिकट झाली आहे. त्यांच्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामळे संततधार पावसाने सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्याची पोलखोल पावसाने केली.
पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली आहे. यातून सिंहस्थात तयार झालेले चकचकीत रस्तेही सुटले नाहीत.
वाहतुकीचा बोजवारा
प्रमख चौकांसह जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांना रस्ता कुठे अन खड्डा कुठे, असा प्रश्न पडला. त्यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवरून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हीच का रस्त्यांची गुणवत्ता, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी १९२ कोटींचे रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. ठेकेदाराने निविदेच्या अटींप्रमाणे लेयरचे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. कुठे एक लेयर टाकला, तर कुठे दुसरा व तिसरा लेयरच टाकलेला नाही. त्यामुळे नवे रस्ते उखडले आहेत. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर अहवाल शहर अभियंत्याकडून मागविला आहे. निविदेतील अटी व शर्ती आणि प्रत्यक्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांसह अधिकाऱ्यांचाही पोलखोल होण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे नव्या रस्त्यांसह सिंहस्थातील दर्जेदार रस्त्यांचीही चाळण झाली. गंगापूर रोडसह शहरांतर्गत रस्ते संततधार पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.
दावा केलेले सिंहस्थातील दर्जेदार रस्ते आणि गेल्या वर्षी १९२ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेने या रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु पावसाने त्यावर पाणी फिरविल्याने सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. दरम्यान आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या रस्त्यांच्या कामांचा अहवाल मागवला आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरात कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवास हा रस्त्यानेच गोदावरी नदीपात्राकडे होत आहे. रस्त्यांवरच पाणी साचल्याने या रस्त्यांची खरी गुणवत्ता समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने १९२ कोटी रुपये खर्चून रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांचीही अवस्थाही बिकट झाली आहे. त्यांच्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामळे संततधार पावसाने सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्याची पोलखोल पावसाने केली.
पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली आहे. यातून सिंहस्थात तयार झालेले चकचकीत रस्तेही सुटले नाहीत.
वाहतुकीचा बोजवारा
प्रमख चौकांसह जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांना रस्ता कुठे अन खड्डा कुठे, असा प्रश्न पडला. त्यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवरून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हीच का रस्त्यांची गुणवत्ता, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी १९२ कोटींचे रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. ठेकेदाराने निविदेच्या अटींप्रमाणे लेयरचे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. कुठे एक लेयर टाकला, तर कुठे दुसरा व तिसरा लेयरच टाकलेला नाही. त्यामुळे नवे रस्ते उखडले आहेत. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर अहवाल शहर अभियंत्याकडून मागविला आहे. निविदेतील अटी व शर्ती आणि प्रत्यक्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांसह अधिकाऱ्यांचाही पोलखोल होण्याची शक्यता आहे.