मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक
नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील दीड तासांपासून ठप्प पडली आहे. नाशिकजवळील ओढा गावाजवळ वाराणसी-दादर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या एक्स्प्रेसला पर्यायी इंजिन लावून इगतपुरी स्थानकात नेण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे.
वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे अन्य लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस , पाटणा एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. बिघाडग्रस्त इंजिनामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील दीड तासांपासून ठप्प पडली आहे. नाशिकजवळील ओढा गावाजवळ वाराणसी-दादर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या एक्स्प्रेसला पर्यायी इंजिन लावून इगतपुरी स्थानकात नेण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे.
वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे अन्य लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस , पाटणा एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. बिघाडग्रस्त इंजिनामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.