म. टा. प्रतिनिधी, नाशिक
खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची नियमबाह्य पद्धतीने होत असलेली ने-आण कायम वादाचा मुद्दा ठरत असली, तरी अद्याप वाहनचालक तसेच शाळा प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकरोड येथे बुधवारी एका धावत्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उभा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक शाळेने परिवहन समितीची स्थापना करणे बंधनकारक असले तरी या निर्णयांना केराची टोपली दाखविण्यातच बहुतांश शाळांनी धन्यता मानल्याने अशा गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे व्यक्त करण्यात येत आहेत.
शहरात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिकरोड उड्डाणपूल चढत असताना शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या व्हॅनने अचानक पेट घेतला. पंधरा ते सतरा विद्यार्थी या व्हॅनमध्ये होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या व्हॅन, रिक्षा व विद्यार्थी सुरक्षा या बाबींकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व शाळांना परिवहन समिती सक्तीने स्थापन करण्याचे आदेश मनपा शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. या समितीच्या माध्यमातून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली होती. तसेच शाळांना परिपत्रकही देण्यात आले होती. मात्र, मुख्याध्यापकांकडून या समितीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने माहिती मागविल्यानंतरही अनेक शाळांनी अहवाल सादर केला नसल्याने त्यांना नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. शिवाय, या समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फतही सूचना केल्या गेल्या असल्या, तरी या निर्णयांना बहुतांश शाळांनी केराची टोपली दाखवित असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धक्का पोहोचत आहे.
व्हॅनचालक बेजबाबदार
अशा दुर्घटनांमध्ये खासगी व्हॅनचालकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असली तरी त्यांची बेजबाबदारी या घटनांना बळी पडते आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असल्याने विद्यार्थी सुरक्षा हा पालकांसमोरील गंभीर मुद्दा बनला आहे.
मुख्याध्यापकांची जबाबदारी
परिवहन समितीअंतर्गत वाहनचालकांचे प्रबोधन करणे, अतिरिक्त विद्यार्थ्यांची वाहतूक होते आहे का हे तपासणे, वेगावर नियंत्रणाविषयी वाहनचालकांशी संवाद साधणे आदी बाबींमध्ये मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे केल्यास दुर्घटना टळण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन केली जावी, अशा सक्तीच्या सूचना आम्ही मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. या समितीअंतर्गत त्यांनी प्रभावीपणे काम करणे अपेक्षित असतानाही काही मुख्याध्यापक बेजबाबदारपणे समितीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा दुर्घटनांची ही जबाबादारी मुख्याध्यापकांनाच घ्यावी लागेल
– नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा, नाशिक
खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची नियमबाह्य पद्धतीने होत असलेली ने-आण कायम वादाचा मुद्दा ठरत असली, तरी अद्याप वाहनचालक तसेच शाळा प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकरोड येथे बुधवारी एका धावत्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उभा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक शाळेने परिवहन समितीची स्थापना करणे बंधनकारक असले तरी या निर्णयांना केराची टोपली दाखविण्यातच बहुतांश शाळांनी धन्यता मानल्याने अशा गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे व्यक्त करण्यात येत आहेत.
शहरात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिकरोड उड्डाणपूल चढत असताना शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या व्हॅनने अचानक पेट घेतला. पंधरा ते सतरा विद्यार्थी या व्हॅनमध्ये होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या व्हॅन, रिक्षा व विद्यार्थी सुरक्षा या बाबींकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व शाळांना परिवहन समिती सक्तीने स्थापन करण्याचे आदेश मनपा शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. या समितीच्या माध्यमातून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली होती. तसेच शाळांना परिपत्रकही देण्यात आले होती. मात्र, मुख्याध्यापकांकडून या समितीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने माहिती मागविल्यानंतरही अनेक शाळांनी अहवाल सादर केला नसल्याने त्यांना नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. शिवाय, या समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फतही सूचना केल्या गेल्या असल्या, तरी या निर्णयांना बहुतांश शाळांनी केराची टोपली दाखवित असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धक्का पोहोचत आहे.
व्हॅनचालक बेजबाबदार
अशा दुर्घटनांमध्ये खासगी व्हॅनचालकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असली तरी त्यांची बेजबाबदारी या घटनांना बळी पडते आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असल्याने विद्यार्थी सुरक्षा हा पालकांसमोरील गंभीर मुद्दा बनला आहे.
मुख्याध्यापकांची जबाबदारी
परिवहन समितीअंतर्गत वाहनचालकांचे प्रबोधन करणे, अतिरिक्त विद्यार्थ्यांची वाहतूक होते आहे का हे तपासणे, वेगावर नियंत्रणाविषयी वाहनचालकांशी संवाद साधणे आदी बाबींमध्ये मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे केल्यास दुर्घटना टळण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन केली जावी, अशा सक्तीच्या सूचना आम्ही मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. या समितीअंतर्गत त्यांनी प्रभावीपणे काम करणे अपेक्षित असतानाही काही मुख्याध्यापक बेजबाबदारपणे समितीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा दुर्घटनांची ही जबाबादारी मुख्याध्यापकांनाच घ्यावी लागेल
– नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा, नाशिक