अ‍ॅपशहर

कॉलेजियन्सनाही आता मिळणार ‘वाचन प्रेरणा’

व्हर्च्युअल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या तरुणवर्गाला वाचन आणि चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी केवळ शाळांतच साजरा होणारा ‘वाचन प्रेरणादिन’ आता कॉलेज स्तरावरही साजरा करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.

Maharashtra Times 12 Oct 2016, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik vachan prerna
कॉलेजियन्सनाही आता मिळणार ‘वाचन प्रेरणा’

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हर्च्युअल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या तरुणवर्गाला वाचन आणि चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी केवळ शाळांतच साजरा होणारा ‘वाचन प्रेरणादिन’ आता कॉलेज स्तरावरही साजरा करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.

यासंदर्भात संचालनालयाने सर्व विद्यापीठ आणि शिक्षण सहसंचालकांना पत्र पाठविले आहे. १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. उच्च शिक्षण विभागाच्या या आदेशांमुळे कॉलेजेसमध्ये येत्या शनिवारी (दि. १५) विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत ‘वाचन प्रेरणा’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान, चर्चासत्र, निबंध, काव्यवाचन, अभिवाचन स्पर्धा, परिसंवाद आणि कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दिवशी कॉलेजांमध्ये लेखकांशी त्याच्या लेखनाविषयी किंवा त्याच्या कलाकृतीविषयी चर्चा अथवा त्यांची प्रकट मुलाखत घेता येणार आहे. वृत्तपत्रांतील अग्रलेख व प्रमुख लेखांचे वाचन आणि ई-बुक्सचे सामूहिक वाचन असे कार्यक्रम आयोजित करण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाला admin@jdhepune.info या ई-मेलवर, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना vinodtawademinister@gmail.com ई-मेलवर पाठविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.


चित्र बदलण्याचा प्रयत्न

वरिष्ठ वर्गांमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या पुस्तक वाचनात रस घेत नसल्याचे काही संस्थांच्या पाहणीचे निष्कर्ष आहेत. परिणामी, ज्ञानसंपन्न समाजाच्या शिक्षणाच्या उद्दिष्टाला बाधा पोहोचते. याशिवाय वाचनाअभावी समाजाची बौद्धिक वाढही सर्वांगीण होत नाही. याबरोबरच तरुणाईच्या हाती इंटरनेट आल्याने मोठ्या प्रमाणावर तरुणाई पुस्तक वाचनापासून दुरावून सामाजिक नुकसान होते आहे. हे चित्र बदलण्यासाठी ‘वाचन प्रेरणादिन’ यासारख्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज