नाशिक: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पुरंदरे यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. 'बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवचरित्राबद्दल शेकडो व्याख्यानं दिली. शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधी आस्था निर्माण करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते. सतत लोकांशी सुसंवाद ठेवत, त्यांच्या सदिच्छा मिळवत त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. ते आज आपल्यात नाहीत. त्याबद्दलची अस्वस्थता व दु:ख अनेकांच्या मनात आहे,' असं पवार म्हणाले.
वाचा: LIVE बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन; अंत्यदर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात
'पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देही होते, पण त्या संबंधी भाष्य करण्याएवढा मी जाणकार किंवा इतिहास तज्ज्ञ नाही. हे सगळं असलं तरी त्यांचं काम मोठं होतं. कुणीही एखाद्या विषयात आयुष्य खर्ची केल्यानंतर काही लोक त्यात उणे काढण्याचा प्रयत्न करतात. तसं त्यांच्या बाबतीतही झालं असावं. असं असलं तरी इतिहासाबद्दल आस्था निर्माण करण्यात त्यांनी दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाही,' असं पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या वाटचालीतील महत्त्वाचा साक्षीदार - अजित पवार
'बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वाचा: संजय राऊतांचा वाढदिवस; नवाब मलिकांनी काढली 'जय-वीरू'ची आठवण
वाचा: LIVE बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन; अंत्यदर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात
'पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देही होते, पण त्या संबंधी भाष्य करण्याएवढा मी जाणकार किंवा इतिहास तज्ज्ञ नाही. हे सगळं असलं तरी त्यांचं काम मोठं होतं. कुणीही एखाद्या विषयात आयुष्य खर्ची केल्यानंतर काही लोक त्यात उणे काढण्याचा प्रयत्न करतात. तसं त्यांच्या बाबतीतही झालं असावं. असं असलं तरी इतिहासाबद्दल आस्था निर्माण करण्यात त्यांनी दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाही,' असं पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या वाटचालीतील महत्त्वाचा साक्षीदार - अजित पवार
'बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वाचा: संजय राऊतांचा वाढदिवस; नवाब मलिकांनी काढली 'जय-वीरू'ची आठवण