म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलावरील निर्माल्य कलश गायब झाला आहे. त्यामुळे नागरिक पुलावरील फूटपाथवर निर्माल्य व कचरा टाकला जात आहे.
या पुलावर महापालिकेचा फलक आहे. त्यावर लिहिले आहे, की निर्माल्य हे कलशामध्ये टाकावे, नदीत टाकू नये; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नदीची स्वच्छता राखा, पावित्र्य राखा. मात्र, फलकाशेजारी निर्माल्य कलशच नाही. त्यामुळे निर्माल्य आणि कचरा फलकाशेजारीच टाकला जात आहे. कुत्री कचऱ्यात तोंड घालून ते विस्कटून टाकत आहे. काही जण नदीत निर्माल्य टाकत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीमुळे तपोवनात बाहेरगावचे पर्यटक येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुलावर आणि गोदावरीतील नदीत कचरा बघून त्यांचे मन विषण्ण होते. त्यामुळे पुलावर, तसेच तपोवनात निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी होत आहे.
जेलरोड कोरडा
जेलरोडला संत जनार्दन स्वामी पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश नसल्याने नागरिक ते नदीत टाकत आहेत. चोपडा लॉन्स व अन्य पुलांवर जाळी लावण्यात आली आहे. निर्माल्य व कचरा नागरिकांनी नदीत टाकू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. जेलरोडचा पूल, टाकळीतील पूल, टाकळीतून औरंगाबाद रोडला जोडणारा रिंगरोडवरील पूल, देवळाली गावातील वालदेवी नदीवरील पूल येथेही निर्माल्य कलश किंवा पुलावर जाळी लावलेली नाही. त्यामुळे कचरा व निर्माल्य थेट नदीपात्रात टाकले जात आहे.
गोदावरी नदीची स्वच्छता ठेवण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. ते लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण पुलावर त्वरित निर्माल्य कलश ठेवावा. पुलावर जाळी किंवा हिरवा कपडा लावल्यास स्थानिक व बाहेरगावचे नागरिक नदीपात्रात कचरा टाकणार नाही.
- भारती जाधव
तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलावरील निर्माल्य कलश गायब झाला आहे. त्यामुळे नागरिक पुलावरील फूटपाथवर निर्माल्य व कचरा टाकला जात आहे.
या पुलावर महापालिकेचा फलक आहे. त्यावर लिहिले आहे, की निर्माल्य हे कलशामध्ये टाकावे, नदीत टाकू नये; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नदीची स्वच्छता राखा, पावित्र्य राखा. मात्र, फलकाशेजारी निर्माल्य कलशच नाही. त्यामुळे निर्माल्य आणि कचरा फलकाशेजारीच टाकला जात आहे. कुत्री कचऱ्यात तोंड घालून ते विस्कटून टाकत आहे. काही जण नदीत निर्माल्य टाकत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीमुळे तपोवनात बाहेरगावचे पर्यटक येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुलावर आणि गोदावरीतील नदीत कचरा बघून त्यांचे मन विषण्ण होते. त्यामुळे पुलावर, तसेच तपोवनात निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी होत आहे.
जेलरोड कोरडा
जेलरोडला संत जनार्दन स्वामी पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश नसल्याने नागरिक ते नदीत टाकत आहेत. चोपडा लॉन्स व अन्य पुलांवर जाळी लावण्यात आली आहे. निर्माल्य व कचरा नागरिकांनी नदीत टाकू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. जेलरोडचा पूल, टाकळीतील पूल, टाकळीतून औरंगाबाद रोडला जोडणारा रिंगरोडवरील पूल, देवळाली गावातील वालदेवी नदीवरील पूल येथेही निर्माल्य कलश किंवा पुलावर जाळी लावलेली नाही. त्यामुळे कचरा व निर्माल्य थेट नदीपात्रात टाकले जात आहे.
गोदावरी नदीची स्वच्छता ठेवण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. ते लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण पुलावर त्वरित निर्माल्य कलश ठेवावा. पुलावर जाळी किंवा हिरवा कपडा लावल्यास स्थानिक व बाहेरगावचे नागरिक नदीपात्रात कचरा टाकणार नाही.
- भारती जाधव