म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळविता यावे यासाठी केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे मोठेपण दाखवित आहे. राज्यात १२ टीएमसीच्या दोन प्रकल्पांसाठीचा आर्थिक भार केंद्राने उचलण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवर का टाकला जातोय, असा घणाघाती सवाल माजी आमदार नितीन भोसले यांनी उपस्थित केला आहे.
आमचे पाणी पळवून आमच्याच माथी खर्च टाकणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खासदार गोडसे यांनी नदीजोड प्रकल्पांतर्गत १२ टीएमसीचे दोन प्रकल्प मंजूर करवून आणल्याबद्दल भोसले यांनी गोडसेंचे अभिनंदन केले आहे. भंडारदऱ्यापासून गिरणा खोऱ्यापर्यंत डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे सुमारे १५६ टीएमसी पाणी समूद्रात वाहून जाते असा माधवराव चितळे समितीचा अहवाल आहे. या १५६ टीएमसी पाण्यापैकी १३६ टीएमसी पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. परंतु या प्रकाराबद्दल गोडसे यांनी एकही शब्द का उच्चारला नाही, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळविता यावे यासाठी केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे मोठेपण दाखवित आहे. राज्यात १२ टीएमसीच्या दोन प्रकल्पांसाठीचा आर्थिक भार केंद्राने उचलण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवर का टाकला जातोय, असा घणाघाती सवाल माजी आमदार नितीन भोसले यांनी उपस्थित केला आहे.
आमचे पाणी पळवून आमच्याच माथी खर्च टाकणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खासदार गोडसे यांनी नदीजोड प्रकल्पांतर्गत १२ टीएमसीचे दोन प्रकल्प मंजूर करवून आणल्याबद्दल भोसले यांनी गोडसेंचे अभिनंदन केले आहे. भंडारदऱ्यापासून गिरणा खोऱ्यापर्यंत डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे सुमारे १५६ टीएमसी पाणी समूद्रात वाहून जाते असा माधवराव चितळे समितीचा अहवाल आहे. या १५६ टीएमसी पाण्यापैकी १३६ टीएमसी पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. परंतु या प्रकाराबद्दल गोडसे यांनी एकही शब्द का उच्चारला नाही, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे.