म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या सिटी बससंदर्भात महामंडळाने जबाबदारी झटकण्याची तयारी सुरू केली असतानाच आता महापालिकेनेही सिटी बससेवेबाबत आस्तेकदम धोरण स्वीकारले आहे. महापालिकेने सिटी बससेवेबाबत कन्सल्टंट नियुक्त केला असून, कन्सल्टंटच्या अहवालानंतरच अभ्यासाअंती महापालिका निर्णय घेणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केेेले आहे.
सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असून, महापालिकेसमोर याबाबत विविध पर्यायही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामंडळाने कितीही प्रयत्न केले, तरी महापालिका सिटी बससेवेची व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या दबावतंत्राचा कोणताही उपयोग होणार नसल्याची चिन्हे आहेत.
शहरांतर्गत बससेवा सध्या राज्य महामंडळाकडून चालविली जात आहे. परंतु, ही सेवा तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने महापालिकेने बससेवा चालवावी किंवा तोटा भरून देण्याची मागणी केली आहे. परंतु, महापालिकेने याबाबत अद्याप आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बससेवा चालविण्याबबत सक्षम नाही. त्यामुळे महामंडळाने बससेवेबाबत महापालिकेवर दबावतंत्र सुरू केले आहे. महामंडळाकडून काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, अचानक संप पुकारून नागरिकांना वेठीस धरले गेले.
एकीकडे महामंडळाने असे दबावतंत्र सुरू केले असतानाच महापालिकेने मात्र सिटी बससेवेबाबत आस्तेकदम चालण्याची भूमिका स्वीकारली आहे. सिटी बससेवा महापालिका चालवू शकते का, याची व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेने कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महासभेने ठरावही मंजूर केला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळाने हस्तांतरणासाठी दबाव वाढविला असला, तरी सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. सिटी बससेवेबाबत पूर्णतः अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रापुढे महापालिका झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेसमोर चार पर्याय
महापालिकेसमोर सिटी बससेवेबाबत चार पर्याय समोर असून, पहिल्या पर्यायात सिटी बससेवा महापालिकेने चालवावी, दुसऱ्या पर्यायात महापालिका ५० टक्के व महामंडळाने ५० टक्के खर्च करावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. तिसऱ्या पर्यायात बससेवेचे खासगीकरण करून केवळ त्या बसवरील कंडक्टर महापालिकेचा असावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. चौथ्या पर्यायात ‘एएसआरटी’अंतर्गत बससेवेचे आधुनिकीकरण करून बससेवा चालवावी, असा प्रस्ताव आहे. परंतु, अंतिम निर्णय व्यवहार्यता तपासून व अभ्यास करूनच घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
--
थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी आमदार जयवंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहर बससेवा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर महापालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नाईलाजास्तव रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.
केवळ नफ्याचा विचार नको
एसटी महामंडळाने शहरातील बस फेऱ्या कमी केल्यामुळे नादुरुस्त काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतल्याने दि. २२ ऑगस्ट रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली. त्यामुळे शहरवासीयांची प्रचंड गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर केवळ नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याकडे किंवा सदर सेवा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या सिटी बससंदर्भात महामंडळाने जबाबदारी झटकण्याची तयारी सुरू केली असतानाच आता महापालिकेनेही सिटी बससेवेबाबत आस्तेकदम धोरण स्वीकारले आहे. महापालिकेने सिटी बससेवेबाबत कन्सल्टंट नियुक्त केला असून, कन्सल्टंटच्या अहवालानंतरच अभ्यासाअंती महापालिका निर्णय घेणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केेेले आहे.
सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असून, महापालिकेसमोर याबाबत विविध पर्यायही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामंडळाने कितीही प्रयत्न केले, तरी महापालिका सिटी बससेवेची व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या दबावतंत्राचा कोणताही उपयोग होणार नसल्याची चिन्हे आहेत.
शहरांतर्गत बससेवा सध्या राज्य महामंडळाकडून चालविली जात आहे. परंतु, ही सेवा तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने महापालिकेने बससेवा चालवावी किंवा तोटा भरून देण्याची मागणी केली आहे. परंतु, महापालिकेने याबाबत अद्याप आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बससेवा चालविण्याबबत सक्षम नाही. त्यामुळे महामंडळाने बससेवेबाबत महापालिकेवर दबावतंत्र सुरू केले आहे. महामंडळाकडून काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, अचानक संप पुकारून नागरिकांना वेठीस धरले गेले.
एकीकडे महामंडळाने असे दबावतंत्र सुरू केले असतानाच महापालिकेने मात्र सिटी बससेवेबाबत आस्तेकदम चालण्याची भूमिका स्वीकारली आहे. सिटी बससेवा महापालिका चालवू शकते का, याची व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेने कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महासभेने ठरावही मंजूर केला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळाने हस्तांतरणासाठी दबाव वाढविला असला, तरी सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. सिटी बससेवेबाबत पूर्णतः अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रापुढे महापालिका झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेसमोर चार पर्याय
महापालिकेसमोर सिटी बससेवेबाबत चार पर्याय समोर असून, पहिल्या पर्यायात सिटी बससेवा महापालिकेने चालवावी, दुसऱ्या पर्यायात महापालिका ५० टक्के व महामंडळाने ५० टक्के खर्च करावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. तिसऱ्या पर्यायात बससेवेचे खासगीकरण करून केवळ त्या बसवरील कंडक्टर महापालिकेचा असावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. चौथ्या पर्यायात ‘एएसआरटी’अंतर्गत बससेवेचे आधुनिकीकरण करून बससेवा चालवावी, असा प्रस्ताव आहे. परंतु, अंतिम निर्णय व्यवहार्यता तपासून व अभ्यास करूनच घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
--
थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी आमदार जयवंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहर बससेवा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर महापालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नाईलाजास्तव रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.
केवळ नफ्याचा विचार नको
एसटी महामंडळाने शहरातील बस फेऱ्या कमी केल्यामुळे नादुरुस्त काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतल्याने दि. २२ ऑगस्ट रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली. त्यामुळे शहरवासीयांची प्रचंड गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर केवळ नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याकडे किंवा सदर सेवा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.