म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नगरसेवकांनी इतर पक्षांत स्थलांतर केल्याने त्याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसला. मागील निवडणुकीत असलेले १५चे बलाबल घसरून सहावर आले आहे.
नाशिक महापालिका २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या चांगली होती. मात्र, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला. या पक्षातील अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला. नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत जाऊ लागले. कॉँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यासारखे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने त्याचाही परिणाम झाला. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत होती. मुलाखतीदरम्यान असलेला गोंधळ अनेकांनी पाहिला होता, तसेच शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते येऊन सभा घेतील, असा अंदाज होता. मात्र, राज्यातील नेत्यांनीही नाशिककडे पाठ फिरवली. केवळ अशोक चव्हाण यांची सभा झाली. इतर पक्षांचा जाहीरनामा येऊन गेल्यानंतर आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आघाडी असतानाही दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र्य जाहीरनामे प्रकाशित केले. यामुळे कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.
मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. या वेळी झालेल्या चुकांची पुढच्या वेळी निश्चित सुधारणा केली जाईल. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून मताधिक्य मिळवले आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला. त्यामुळे भाजपला जागा मिळाल्या. विरोधात राहून जनतेच्या प्रश्नांची तड लावू.
- शरद आहेर, अध्यक्ष नाशिक शहर कॉँग्रेस
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नगरसेवकांनी इतर पक्षांत स्थलांतर केल्याने त्याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसला. मागील निवडणुकीत असलेले १५चे बलाबल घसरून सहावर आले आहे.
नाशिक महापालिका २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या चांगली होती. मात्र, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला. या पक्षातील अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला. नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत जाऊ लागले. कॉँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यासारखे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने त्याचाही परिणाम झाला. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत होती. मुलाखतीदरम्यान असलेला गोंधळ अनेकांनी पाहिला होता, तसेच शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते येऊन सभा घेतील, असा अंदाज होता. मात्र, राज्यातील नेत्यांनीही नाशिककडे पाठ फिरवली. केवळ अशोक चव्हाण यांची सभा झाली. इतर पक्षांचा जाहीरनामा येऊन गेल्यानंतर आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आघाडी असतानाही दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र्य जाहीरनामे प्रकाशित केले. यामुळे कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.
मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. या वेळी झालेल्या चुकांची पुढच्या वेळी निश्चित सुधारणा केली जाईल. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून मताधिक्य मिळवले आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला. त्यामुळे भाजपला जागा मिळाल्या. विरोधात राहून जनतेच्या प्रश्नांची तड लावू.
- शरद आहेर, अध्यक्ष नाशिक शहर कॉँग्रेस