म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने चालू वर्षात पाणीपट्टी वसुलीसाठी ६७ हजार ग्राहकांना नोटिसा बजावल्यानंतर वसुलीत चांगलीच वाढ झाली. त्यामुळे पाणीपट्टीपाठोपाठ आता मालमत्ता कर थकबाकीदारांकडे पालिकेने मोर्चा वळवला आहे. विविध कर विभागाने मालमत्ता कर थकीत असलेल्या ४७ हजार बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यांना वसुलीसाठी अंतिम नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे. या ४७ हजार जणांकडे ४५ कोटींची थकबाकी असून, अंतिम नोटीस देऊनही थकबाकी भरली नाही, तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकही आता पालिकेच्या रडारवर आले आहेत.
उत्पन्नाची साधने मर्यादीत झाल्याने व जीएसटी अनुदानावरच अवलंबून असलेल्या पालिकेने आता मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिकेने पाणीपट्टीच्या ६७ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून आठ कोटी ७८ लाखांची अधिकची वसुली झाली आहे. पाणीपट्टीची नियमित वसुली २३ कोटी ५८ लाख झाली असून, नोटीस अस्त्रारामुळे गेल्या वर्षापेक्षा दहा कोटींनी अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे आता पालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने चालू वर्षी मालमत्ता कराचे ११० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५९ कोटी १९ लाखांची वसुली झाली आहे. परंतु, तरीही चालू वर्षात जवळपास ५० कोटींची थकबाकी आहे. गेल्या वर्षीची थकबाकी ३१ कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षीची ३१ कोटी ६७ लाख आणि चालू वर्षातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली १२ कोटीं ८८ लाखांची थकबाकी वसुलीसाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षीचे आणि सध्याचे थकबाकीदार मिळून ४७ हजार ४१५ मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस काढण्याची तयारी केली आहे. या सर्वांकडे जवळपास ४४ कोटी ५६ लाखांची थकबाकी असून, हे सर्व दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम बाकी असलेले नागरिक आहेत. या सर्वांना आजपासून (दि. १ डिसेंबर) अंतिम नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यांना थकबाकी जमा करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. अल्टिमेटमनंतरही थकबाकी भरली नाही, तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
नव्यांनाही तगादा
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले असून, त्यात आतापर्यंत जवळपास ५८ हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत. त्या सर्व मालमत्तांची छाननी पूर्ण झाली असून, त्यांनाही वसुलीसाठी नोटिसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नाही, त्या सर्वांकडून गेल्या सहा वर्षांपासूनचा मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे. तर ज्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आहे, परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही अशा मालमत्ताधारकांकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळविलेल्या तारखेपासून वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.त्यामुळे यातूनही पालिकेला ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
महापालिकेने चालू वर्षात पाणीपट्टी वसुलीसाठी ६७ हजार ग्राहकांना नोटिसा बजावल्यानंतर वसुलीत चांगलीच वाढ झाली. त्यामुळे पाणीपट्टीपाठोपाठ आता मालमत्ता कर थकबाकीदारांकडे पालिकेने मोर्चा वळवला आहे. विविध कर विभागाने मालमत्ता कर थकीत असलेल्या ४७ हजार बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यांना वसुलीसाठी अंतिम नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे. या ४७ हजार जणांकडे ४५ कोटींची थकबाकी असून, अंतिम नोटीस देऊनही थकबाकी भरली नाही, तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकही आता पालिकेच्या रडारवर आले आहेत.
उत्पन्नाची साधने मर्यादीत झाल्याने व जीएसटी अनुदानावरच अवलंबून असलेल्या पालिकेने आता मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिकेने पाणीपट्टीच्या ६७ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून आठ कोटी ७८ लाखांची अधिकची वसुली झाली आहे. पाणीपट्टीची नियमित वसुली २३ कोटी ५८ लाख झाली असून, नोटीस अस्त्रारामुळे गेल्या वर्षापेक्षा दहा कोटींनी अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे आता पालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने चालू वर्षी मालमत्ता कराचे ११० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५९ कोटी १९ लाखांची वसुली झाली आहे. परंतु, तरीही चालू वर्षात जवळपास ५० कोटींची थकबाकी आहे. गेल्या वर्षीची थकबाकी ३१ कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षीची ३१ कोटी ६७ लाख आणि चालू वर्षातील बड्या थकबाकीदारांकडे असलेली १२ कोटीं ८८ लाखांची थकबाकी वसुलीसाठी पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षीचे आणि सध्याचे थकबाकीदार मिळून ४७ हजार ४१५ मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस काढण्याची तयारी केली आहे. या सर्वांकडे जवळपास ४४ कोटी ५६ लाखांची थकबाकी असून, हे सर्व दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम बाकी असलेले नागरिक आहेत. या सर्वांना आजपासून (दि. १ डिसेंबर) अंतिम नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यांना थकबाकी जमा करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. अल्टिमेटमनंतरही थकबाकी भरली नाही, तर थेट मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
नव्यांनाही तगादा
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले असून, त्यात आतापर्यंत जवळपास ५८ हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत. त्या सर्व मालमत्तांची छाननी पूर्ण झाली असून, त्यांनाही वसुलीसाठी नोटिसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नाही, त्या सर्वांकडून गेल्या सहा वर्षांपासूनचा मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे. तर ज्यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आहे, परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही अशा मालमत्ताधारकांकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळविलेल्या तारखेपासून वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.त्यामुळे यातूनही पालिकेला ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे.