टपाल कार्यालयाच्या जागेमुळे ज्येष्ठांचे हाल
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
गेल्या नऊ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून पंचवटीत असलेले सर्वात जुने काळाराम मंदिर टपाल कार्यालयाचे सोमवारी (दि. २८) स्थलांतर करण्यात आले आहे. सोयीच्या जागेत असलेले हे टपाल कार्यालय दुसऱ्या मजल्यावरच्या अडचणीच्या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांच्या हे कार्यालय गैरसोयीचे ठरणार आहे. या स्थलांतराविरोधात जनआंदोलन पेटणार असल्याचे पंचवटीतील नागरिकांनी सांगितले.
पंचवटीतील काळाराम मंदिर पोस्ट ऑफिस हे जुन्या बांधकामाच्या दगडी बांधकाम असलेल्या घरात होते. ते खालच्या मजल्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ते सोयीचे होते. पोस्टाच्या कामासाठी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांना नवीन ठिकाणच्या जागेत जिन्याच्या अनेक पायऱ्या चढून जाणे अवघड होणार आहे. या अडचणीचा पोस्ट ऑफिस स्थलांतर करताना प्रशासनाने कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळेच या नव्या कार्यालयास नागरिक विरोध करीत आहेत.
स्थलांतराचे कारण वरिष्ठांना माहिती
दुसरीकडे नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचा बोर्डदेखील अजून लावण्यात आलेला नाही. तर पोस्ट ऑफिसचा जुना बोर्ड पुसट झालेला असल्यामुळे नव्याने रंगून आणल्यानंतर हा बोर्ड लावण्यात येणार असल्याचे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र स्थलांतराचे कारण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील वास्तुच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यात पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या दक्षिणेला तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या पार्किंगच्या जागेच्या मागच्या बाजूला असल्याने हा जिना लवकर लक्षात येत नाही. या पार्किंगच्या जागेत खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपऱ्या असल्यामुळे या जिन्याचा शोध घ्यावा लागतो, अशा अडचणीच्या ठिकाणी स्थलांतर नको असे नागरिकांचे मत आहे.
नारोशंकर मंदिराच्या समोर महापालिकेने बांधलेल्या वास्तुच्या गाळ्यांकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. गैरसोयीची अशी ही वास्तू गेली २० वर्षांपासून पडून आहे. या वास्तुच्या दुसऱ्या मजल्यावर हे टपाल कार्यालय स्थलांतरीत करण्यास पंचवटीकरांचा विरोध आहे. यासंदर्भात बैठक घेण्यात येऊन जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे.
विश्वास मदाने, रहिवाशी
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
गेल्या नऊ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून पंचवटीत असलेले सर्वात जुने काळाराम मंदिर टपाल कार्यालयाचे सोमवारी (दि. २८) स्थलांतर करण्यात आले आहे. सोयीच्या जागेत असलेले हे टपाल कार्यालय दुसऱ्या मजल्यावरच्या अडचणीच्या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांच्या हे कार्यालय गैरसोयीचे ठरणार आहे. या स्थलांतराविरोधात जनआंदोलन पेटणार असल्याचे पंचवटीतील नागरिकांनी सांगितले.
पंचवटीतील काळाराम मंदिर पोस्ट ऑफिस हे जुन्या बांधकामाच्या दगडी बांधकाम असलेल्या घरात होते. ते खालच्या मजल्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ते सोयीचे होते. पोस्टाच्या कामासाठी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांना नवीन ठिकाणच्या जागेत जिन्याच्या अनेक पायऱ्या चढून जाणे अवघड होणार आहे. या अडचणीचा पोस्ट ऑफिस स्थलांतर करताना प्रशासनाने कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळेच या नव्या कार्यालयास नागरिक विरोध करीत आहेत.
स्थलांतराचे कारण वरिष्ठांना माहिती
दुसरीकडे नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचा बोर्डदेखील अजून लावण्यात आलेला नाही. तर पोस्ट ऑफिसचा जुना बोर्ड पुसट झालेला असल्यामुळे नव्याने रंगून आणल्यानंतर हा बोर्ड लावण्यात येणार असल्याचे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र स्थलांतराचे कारण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील वास्तुच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यात पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या दक्षिणेला तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या पार्किंगच्या जागेच्या मागच्या बाजूला असल्याने हा जिना लवकर लक्षात येत नाही. या पार्किंगच्या जागेत खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपऱ्या असल्यामुळे या जिन्याचा शोध घ्यावा लागतो, अशा अडचणीच्या ठिकाणी स्थलांतर नको असे नागरिकांचे मत आहे.
नारोशंकर मंदिराच्या समोर महापालिकेने बांधलेल्या वास्तुच्या गाळ्यांकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. गैरसोयीची अशी ही वास्तू गेली २० वर्षांपासून पडून आहे. या वास्तुच्या दुसऱ्या मजल्यावर हे टपाल कार्यालय स्थलांतरीत करण्यास पंचवटीकरांचा विरोध आहे. यासंदर्भात बैठक घेण्यात येऊन जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे.
विश्वास मदाने, रहिवाशी